शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी केला लोकसभेत सभात्याग; नरेंद्र मोदी सरकारचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 02:45 IST

फारुक अब्दुल्ला सहा महिन्यांपासून स्थानबद्धतेत, मुक्त करण्याची मागणी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व श्रीनगरचे विद्यमान खासदार फारुक अब्दुल्ला यांना अवैधरीत्या ताब्यात ठेवले आहे, असा मोदी सरकारवर आरोप करीत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी बुधवारी लोकसभेतून सभात्याग केला.

जम्मू-काश्मीरशी संबंधित ३७० व ३५ अ कलम ५ आॅगस्ट रोजी रद्दबातल केल्यानंतर लगेचच फारुक अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भात काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी सभागृहात सांगितले की, कोणतेही योग्य कारण न देता फारुक अब्दुल्ला यांच्यासह जम्मू-काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना गेल्या सहा महिन्यांपासून ताब्यात ठेवण्यात आले आहे. हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारचा निषेध करत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.

फारुक अब्दुल्ला यांना मोदी सरकारने ताब्यात ठेवल्याचा मुद्दा तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय यांनीही सभागृहात मांडला. हाच मुद्दा यापूर्वी सर्वपक्षीय बैठकीतही उपस्थित करण्यात आला होता. बंडोपाध्याय म्हणाले की, केंद्र सरकारने किमान फारुक अब्दुल्ला यांच्या प्रकृतीबद्दल तरी लोकसभेला माहिती द्यावी. अब्दुल्लांबद्दलचा मुद्दा सभागृहात सर्वप्रथम काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना लोकसभा अध्यक्षांनी रोखले.

लोकप्रतिनिधी म्हणून फारुक अब्दुल्ला यांना काही हक्क आहेत. सरकारने त्यांना ताब्यात ठेवल्यामुळे फारुक अब्दुल्ला लोकसभेच्या कामकाजात तसेच काश्मीरच्या राजकीय जीवनात सहभागी होऊ शकत नसल्याकडेही विरोधकांनी लक्ष वेधले. फारुक अब्दुल्ला यांची सुटका करावी अशा घोषणा काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लिग या पक्षांच्या खासदारांनी सभागृहाच्या हौद्यामध्ये येऊन दिल्या.

ही लोकशाही आहे का? : प्रियांका गांधी

फारुक अब्दुल्ला यांना गेल्या सहा महिन्यांपासून मोदी सरकारने ताब्यात ठेवले आहे. ही लोकशाही आहे का, असा सवाल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी विचारला आहे. त्या म्हणाल्या की, अब्दुल्ला यांच्यावर कोणताही आरोप न ठेवताच कारवाई करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमध्ये कित्येक लाख लोकांना असे जिणे जगावे लागत आहे. अब्दुल्लांवर कारवाई केली त्यावेळी त्यांना किती दिवस ताब्यात ठेवणार असा सवाल आम्ही विचारला होता. भारतात खरंच लोकशाही आहे का, असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे, असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

सीएएच्या विरोधात दिल्लीत ६६ आंदोलने गृहराज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती : आतापर्यंत ९९ लोकांना अटकनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात आतापर्यंत राजधानी दिल्लीत ६६ आंदोलने झाल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली. हिंसक वळण घेणाऱ्या आंदोलनांसंदर्भात ११ प्रकरणे नोंदविली असून, ९९ लोकांना अटक केल्याचेही त्यांनी सांगितले.

जामिया विद्यापीठात पोलिसांनी कुणाचीही परवानगी न घेता प्रवेश केला होता का, या प्रश्नावर आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांचा शोध घेण्याच्या आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस विद्यापीठात गेले होते, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. दिल्लीतील या आंदोलनांमध्ये ३६ विद्यार्थ्यांसह १२७ लोक व ६२ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते, असेही मंत्र्यांनी नमूद केले. हिंसक आंदोलने, जमावबंदी असताना झालेली आंदोलने व पोलिसांवरील दगडफेक याअंतर्गत अटक कारवाई केल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

जेएनयूतील हल्ल्यात ५१ जखमी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ५ जानेवारीला झालेल्या हल्ल्यात ५१ लोक जखमी झाले. यात खासगी वाहने व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, असेही मंत्री म्हणाले. या हल्ल्यानंतर जेएनयूतील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विद्यापीठ परिसरात साध्या वेशातील पोलीस तैनात केले आहेत.विद्यापीठ प्रशासनानेही २७७ खासगी सुरक्षारक्षक नेमले आहेत, असेही ते म्हणाले. एकाही जखमी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला नसल्याचा दावाही सरकारने केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसीdelhiदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेस