शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

विरोधी पक्षांची पुढील बैठक बंगळुरूत, सोनिया गांधी उपस्थित राहणार, खरगेंनी पाठवले निमंत्रण पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 11:32 IST

या बैठकीला जवळपास २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.

बंगळुरू : पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्याच्या तयारीला वेग आला आहे. पाटण्यानंतर आता विरोधी पक्षांची पुढील बैठक १७ आणि १८ जुलै रोजी होणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथे काँग्रेसने बोलावलेली ही दुसरी विरोधी पक्षांची एकता बैठक आहे. या बैठकीला जवळपास २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आठ नवीन पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी विरोधी आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात बिहारच्या पाटणा येथे झालेल्या मेगा विरोधी बैठकीनंतर २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते बंगळुरू येथे होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

यामध्ये मरुमलारची द्रविड, मुनेत्र कळघम (एमडीएमके), कोंगू देसा मक्कल काची (केडीएमके), विदुथलाई चिरुथिगल काची (वीसीके), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल), केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि केरळ काँग्रेस (मणि) हे नवीन राजकीय पक्ष आहेत, जे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी होणार आहेत. दरम्यान, केडीएमके आणि एमडीएमके हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सहयोगी पक्ष होते, परंतु आता ते विरोधी पक्षांमध्ये सामील झाले आहे. या बैठकीसाठी या सर्व पक्षांना एकत्र आणण्याचे सर्व श्रेय काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना दिले जात आहे. 

विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात काँग्रेस अध्यक्षांनी त्यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीत आपल्या सहभागाची आठवण करून दिली. मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या निमंत्रण पत्रात म्हटले आहे की, पाटणा बैठक एक मोठे यश आहे, कारण आम्ही आमच्या लोकशाही राजकारणाला धोक्यात आणणार्‍या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकलो आणि पुढील सार्वत्रिक निवडणूक एकजुटीने लढण्याचे एकमताने सहमत केले. 

आम्ही जुलैमध्ये पुन्हा भेटण्याचे ठरवले आहे, याची आठवण काँग्रेस अध्यक्षांनी नेत्यांना करून दिली. पत्रात पुढे म्हटले आहे की, मला वाटते की, या चर्चा पुढे सुद्धा चालू ठेवणे आणि आम्ही तयार केलेली गती वाढवणे महत्वाचे आहे. आपला देश ज्या आव्हानांना तोंड देत आहे, त्यावर उपाय शोधण्यासाठी आपल्याला एकत्र काम करण्याची गरज आहे. मी तुम्हाला १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती करतो.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण