शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

विरोधी पक्षांची पुढील बैठक बंगळुरूत, सोनिया गांधी उपस्थित राहणार, खरगेंनी पाठवले निमंत्रण पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 11:32 IST

या बैठकीला जवळपास २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.

बंगळुरू : पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्याच्या तयारीला वेग आला आहे. पाटण्यानंतर आता विरोधी पक्षांची पुढील बैठक १७ आणि १८ जुलै रोजी होणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथे काँग्रेसने बोलावलेली ही दुसरी विरोधी पक्षांची एकता बैठक आहे. या बैठकीला जवळपास २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आठ नवीन पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी विरोधी आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात बिहारच्या पाटणा येथे झालेल्या मेगा विरोधी बैठकीनंतर २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते बंगळुरू येथे होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

यामध्ये मरुमलारची द्रविड, मुनेत्र कळघम (एमडीएमके), कोंगू देसा मक्कल काची (केडीएमके), विदुथलाई चिरुथिगल काची (वीसीके), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल), केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि केरळ काँग्रेस (मणि) हे नवीन राजकीय पक्ष आहेत, जे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी होणार आहेत. दरम्यान, केडीएमके आणि एमडीएमके हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सहयोगी पक्ष होते, परंतु आता ते विरोधी पक्षांमध्ये सामील झाले आहे. या बैठकीसाठी या सर्व पक्षांना एकत्र आणण्याचे सर्व श्रेय काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना दिले जात आहे. 

विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात काँग्रेस अध्यक्षांनी त्यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीत आपल्या सहभागाची आठवण करून दिली. मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या निमंत्रण पत्रात म्हटले आहे की, पाटणा बैठक एक मोठे यश आहे, कारण आम्ही आमच्या लोकशाही राजकारणाला धोक्यात आणणार्‍या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकलो आणि पुढील सार्वत्रिक निवडणूक एकजुटीने लढण्याचे एकमताने सहमत केले. 

आम्ही जुलैमध्ये पुन्हा भेटण्याचे ठरवले आहे, याची आठवण काँग्रेस अध्यक्षांनी नेत्यांना करून दिली. पत्रात पुढे म्हटले आहे की, मला वाटते की, या चर्चा पुढे सुद्धा चालू ठेवणे आणि आम्ही तयार केलेली गती वाढवणे महत्वाचे आहे. आपला देश ज्या आव्हानांना तोंड देत आहे, त्यावर उपाय शोधण्यासाठी आपल्याला एकत्र काम करण्याची गरज आहे. मी तुम्हाला १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती करतो.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण