शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

“सरकारकडून उत्तरे मागितल्यामुळेच निलंबनाची कारवाई”; विरोधकांची केंद्रावर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 18:46 IST

Winter Session Of Parliament 2023: संसद सुरक्षा त्रुटीवरून विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केल्यानंतर संसदेतून १५ सदस्यांचे निलंबन करण्यात आले. यावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली.

Winter Session Of Parliament 2023: लोकसभेत बुधवारी झालेल्या प्रकारामुळे सुरक्षा प्रोटोकॉलमधील त्रुटी समोर आल्या आहेत. सुरक्षा यंत्रणेत झालेल्या गंभीर चुकीबाबत विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. संसदेच्या सुरक्षेत घडलेल्या गंभीर चुकीमुळे विरोधकांनी संसदेत प्रचंड गोंधळ घातला. यावेळी विरोधी पक्षाच्या १५ खासदारांचे निलंबन करण्यात आले. सरकारकडून उत्तरे मागितल्यामुळेच निलंबनाची कारवाई करण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. 

संसदेच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोकसभेतील १४ आणि राज्यसभेतील एका खासदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे निलंबन संपूर्ण अधिवेशनासाठी लागू असेल. निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसच्या ५ खासदारांचा समावेश आहे. या कारवाईवरून विरोधक आक्रमक झाले असून, केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

खासदारांना सभागृहातून निलंबित करण्याची संस्कृती विकसित 

सरकारने खासदारांना सभागृहातून निलंबित करण्याची संस्कृती विकसित केली आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीला विरोध करताच, तुमचा मुद्दा रेकॉर्डवर जाणार नाही, असे सांगितले जाते, मग खासदारांनी चर्चेत भाग घेण्याचा अर्थ काय, असा सवाल राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी केला आहे. दुसरीकडे, सरकार आपले अपयश लपवण्यासाठी निलंबनाची कारवाई करत आहे. सत्ताधाऱ्यांना अशा कृतीतून भीतीचे वातावरण निर्माण करायचे आहे. त्याशिवाय त्यांना राज्य करता येत नाही. लोकसभा आणि संपूर्ण संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी, गुप्तचर यंत्रणांचे अपयश, याबाबत विरोधी पक्षाचे खासदार गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावे, अशी मागणी करत असतील, तर त्यात गैर काय आहे, अशी विचारणा जदयू खासदार राजीव रंजन सिंह यांनी केली आहे. 

दरम्यान, जे घडले ते एक मोठे सुरक्षा आणि गुप्तचर अपयश होते. सरकारने सभागृहात निवेदन द्यावे, अशी आमची इच्छा आहे. गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी १३ डिसेंबरच्या घटनेची संपूर्ण माहिती द्यावी. आगामी काळात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकार काय पावले उचलणार आहे, हेही खासदारांनी सांगावे? सभागृहात निवेदन न देण्यावर सरकार ठाम आहे. पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री शाह यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या आणि सभागृहात निषेध नोंदवणाऱ्या विरोधी बाकांवरील खासदारांचा आवाज सरकार दाबत आहे, अशी टीका काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांनी केली. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाMember of parliamentखासदारCentral Governmentकेंद्र सरकार