शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
3
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
4
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
5
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
6
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
7
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
8
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
9
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
10
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
11
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
12
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
13
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
14
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
15
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
16
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
17
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
18
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
19
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
20
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
Daily Top 2Weekly Top 5

जातींच्या आकडेवारीसाठी विरोधक एकवटले

By admin | Updated: July 7, 2015 23:29 IST

सामाजिक- आर्थिक- जात जनगणना २०११ चा डाटा जारी करताना जातनिहाय आकडेवारी देण्याचे टाळल्याबद्दल संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी एकजूट चालविली आहे.

नवी दिल्ली : सामाजिक- आर्थिक- जात जनगणना २०११ चा डाटा जारी करताना जातनिहाय आकडेवारी देण्याचे टाळल्याबद्दल संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी एकजूट चालविली आहे. काँग्रेस, माकप, द्रमुक, समाजवादी पक्ष, राजद आणि जेडीयू या पक्षांनी ही मागणी लावून धरली आहे.जातनिहाय आकडेवारी जारी न करण्यामागे बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे राजकारण नसल्याचे सरकारने स्पष्ट केले असले तरी ओबीसी मतांवर डोळा ठेवून विविध पक्षांनी या मागणीत रंग भरला आहे. हिंदी पट्ट्यातील ओबीसींची संख्या पाहता भाजपने बिहार आणि उत्तर प्रदेशात ओबीसी आघाडीची स्थापना केली आहे. बिहारमध्ये लवकरच तर उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या राज्यात मागासवर्गीयांची संख्या निर्णायक ठरते.आम्ही हा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहांत उपस्थित करणार असून, सरकारला जातीय गणना जाहीर करण्यास भाग पाडण्यासाठी संयुक्त डावपेच आखण्यावर आमचा भर राहील, असे जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी स्पष्ट केले.भविष्यात आरक्षित घटकांचा कोटा कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने अनसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि उच्चवर्गीयांच्या संख्येसंबंधी आकडेवारी जारी करण्याचे टाळले आहे. सरकारला देशापासून सत्य दडवून ठेवायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी, माकपच्या नेत्या सुभाषिनी अली, काँग्रेसचे प्रवक्ते राजीव गौडा यांनीही आकडेवारी जारी करण्याच्या मागणीचे समर्थन केले. (वृत्तसंस्था) ललित मोदी प्रकरण, व्यापमंवरून रणकंदन होणार> संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै रोजी सुरू होत असून १३ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. ललित मोदी प्रकरण, व्यापमं घोटाळा यासारख्या मुद्यांनी आधीच वातावरण तापले असताना जनगणनेच्या मुद्यावर चालविलेली एकजूट पाहता हे अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत मिळाले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव हे लोकसभेत माहिती जारी करण्याचा मुद्दा उपस्थित करणार असून, या निमित्ताने का होईना संसदेत जनता परिवाराची एकजूट बघायला मिळेल. करुणानिधी यांनीही सोमवारी जातनिहाय आकडेवारी जारी करण्याची मागणी केली. पीएमके या तामिळनाडूतील प्रमुख पक्षानेही या मागणीला दुजोरा दिला आहे.माहिती जाहीर करणे आवश्यक -काँग्रेस> डाटा उपलब्ध असताना तो जारी करायला हवा. विविध कार्यक्रम कितपत यशस्वी झाले, याची माहिती त्यातून मिळेल. त्याचा कुणाला लाभ मिळाला तेही कळू शकेल. त्यामुळे ही माहिती जारी करायलाच हवी, असे काँग्रेसचे प्रवक्ते राजीव गौडा यांनी म्हटले.