शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने झारखंडमध्ये सरकार पडण्यापासून वाचवलं"; राहुल गांधींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 11:10 IST

"भाजपाला आम्ही घाबरत नाही, लढत राहतो"

Jharkhand Politics, Rahul Gandhi vs BJP: झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. सर्वप्रथम मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे दिल्लीला गेले आणि बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली. झारखंडमध्ये सरकार कोसळणार अशी चर्चा रंगू लागली. त्यात चंपई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी राज्यातील राजकीय तापमान शांत झालेले नाही. ३६ आमदारांना हैदराबादला हलवण्यात आले आहे. कारण महाआघाडीचे आमदार फोडण्याचा धोका आहे. या दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक दावा केला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीमुळेच झारखंडमध्ये सरकार पाडण्यात भाजपाला यश मिळाले नाही असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, झारखंडमधील जनतेने दिलेला जनादेश वाया घालवण्यापासून भाजपाला रोखण्यात इंडिया आघाडी यशस्वी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या भारत जोडो न्याय यात्रेला शनिवारी झारखंडमधील गोड्डा येथील सरकंदा चौकातून सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी विधान केले.

"भाजपने मनी पॉवर आणि तपास यंत्रणांचा वापर केला. आम्ही भाजपला घाबरत नाहीत आणि फुटीर विचारसरणीशी लढत राहतो. पूर्वीची भारत जोडो यात्रा आरएसएस आणि भाजपच्या 'विभाजनकारी अजेंड्या'च्या विरोधात होती, परंतु सध्याची यात्रा देशातील जनतेला न्याय देण्याची मागणी करणारी आहे. झारखंडमध्ये निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा भाजपने प्रयत्न केला. पण इंडिया आघाडीने तसे होऊ दिले नाही," असे राहुल गांधी स्पष्ट शब्दांत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "भारत आघाडीने पक्षाला जनादेश चोरू दिला नाही. महागाई आणि वाढती बेरोजगारी यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर अन्याय दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतात तरुणांना रोजगार मिळणे अशक्य आहे. देशातील बेरोजगारीचा दर 40 वर्षांतील सर्वाधिक आहे. तुमची 'मन की बात' आम्ही ऐकतो, पण आमच्या मनात जे आहे ते तुम्ही सांगू नका, आमचे ऐकत चला."

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJharkhandझारखंडBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी