शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

"विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने झारखंडमध्ये सरकार पडण्यापासून वाचवलं"; राहुल गांधींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 11:10 IST

"भाजपाला आम्ही घाबरत नाही, लढत राहतो"

Jharkhand Politics, Rahul Gandhi vs BJP: झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. सर्वप्रथम मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे दिल्लीला गेले आणि बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली. झारखंडमध्ये सरकार कोसळणार अशी चर्चा रंगू लागली. त्यात चंपई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी राज्यातील राजकीय तापमान शांत झालेले नाही. ३६ आमदारांना हैदराबादला हलवण्यात आले आहे. कारण महाआघाडीचे आमदार फोडण्याचा धोका आहे. या दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक दावा केला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीमुळेच झारखंडमध्ये सरकार पाडण्यात भाजपाला यश मिळाले नाही असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, झारखंडमधील जनतेने दिलेला जनादेश वाया घालवण्यापासून भाजपाला रोखण्यात इंडिया आघाडी यशस्वी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या भारत जोडो न्याय यात्रेला शनिवारी झारखंडमधील गोड्डा येथील सरकंदा चौकातून सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी विधान केले.

"भाजपने मनी पॉवर आणि तपास यंत्रणांचा वापर केला. आम्ही भाजपला घाबरत नाहीत आणि फुटीर विचारसरणीशी लढत राहतो. पूर्वीची भारत जोडो यात्रा आरएसएस आणि भाजपच्या 'विभाजनकारी अजेंड्या'च्या विरोधात होती, परंतु सध्याची यात्रा देशातील जनतेला न्याय देण्याची मागणी करणारी आहे. झारखंडमध्ये निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा भाजपने प्रयत्न केला. पण इंडिया आघाडीने तसे होऊ दिले नाही," असे राहुल गांधी स्पष्ट शब्दांत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "भारत आघाडीने पक्षाला जनादेश चोरू दिला नाही. महागाई आणि वाढती बेरोजगारी यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर अन्याय दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतात तरुणांना रोजगार मिळणे अशक्य आहे. देशातील बेरोजगारीचा दर 40 वर्षांतील सर्वाधिक आहे. तुमची 'मन की बात' आम्ही ऐकतो, पण आमच्या मनात जे आहे ते तुम्ही सांगू नका, आमचे ऐकत चला."

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJharkhandझारखंडBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी