शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

"विरोधकांना मणिपूर मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय; ...यामुळेच तेथील जनतेनं काँग्रेसचा हात सोडला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:43 IST

श्रीकांत शिंदे म्हणाले, २०१४ पर्यंत नॉर्थ इस्टच्या ७ पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि एका राज्यात डाव्यांचे सरकार होते. आज जवळपास संपूर्ण नॉर्थइस्ट एनडीएसोबत आहे.

मणिपूरमध्ये जे काही होत आहे. तो सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. आम्ही याची निंदा करतो आणि यावर गांभीर्याने विचार होणे, तसेच कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना मणिपूरच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करायचे आहे, असे म्हणत शिवसेना (एकनाथ शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मणिपूर हिंसाचारावरून संसदेत आज मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेस नेते गौरव गोगाई यांनी लोकसभेत हा प्रस्ताव मांडल्यानंतर, चर्चेला सुरुवात झाली. यावेली शिंदे यांनीही चर्चेत भाग घेतला होता.

श्रीकांत शिंदे म्हणाले, २०१४ पर्यंत नॉर्थ इस्टच्या ७ पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि एका राज्यात डाव्यांचे सरकार होते. आज जवळपास संपूर्ण नॉर्थइस्ट एनडीएसोबत आहे. कारण काँग्रेस नॉर्थ इस्टच्या बाबतीत कधीच गंभीर नव्हती. यामुळेच तेथील जनतेने काँग्रेसचा हात सोडला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ दिली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी २०१४ ते २०२३ दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या महत्वाच्या कामांचा पाढा वाचला. तसेच येथील विकास कामेही सांगितली. 

याशिवाय, काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले दहशतवादी हल्ल्यांवर, आणि मोदी सरकारच्या कार्यकाळात पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकवरही श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले.

२००४ ते २०१४ पर्यंत यूपीएने देशावर राज्य केलं. मात्र देशाला काय मिळाले? -शिंदे म्हणाले, 'हे  म्हणतात, "नफरत की बाजार, में मोहोब्बतकी दुकान खोल रहा हूं". मला वाटते, एका व्यक्तीच्याविरोधात हे सर्व लोक एकत्रित येत आहेत. ज्यांना कुणी नेता नाही, ज्यांची नियत नाही आणि ज्यांची कसल्याही प्रकारची निती नाही. अशी आघाडी येथे ऊभी झाली आहे. २००४ ते २०१४ पर्यंत यूपीएने देशावर राज्य केलं. मात्र देशाला काय मिळाले? केवळ घोटाळे आणि भष्टाचार. दहशतवादी हल्ले एवढे झाली की, देशातील एकही मोठे शहर या दहशतवादी हल्ल्यापासून सुटले नाही.'

"आडला हरी आणि..." -'INDIA नाव देऊन आपण लोकांची दिशाभूल करू शकतो, असे यांना वाटते. आज यांच्या आघाडीत पीएम इन वेटिंग आहे. कारण या टीमकडे कुणी कर्णधार नाही आणि यांना सामना लढवायचा आहे अन् विश्वचषक जिंकायचा आहे. आमच्या महाराष्ट्रात एक म्हण प्रसिद्ध आहे, "आडला हरी आणि गाढवाचे पाय धरी". मजबुरी लोकांना काय काय करायला भाग पाडते?' असेही शिंदे यावेळी म्हणाले.

स्किम VS स्कॅमची लढाई -येथे केवळ NDA vs INDIA चा सामना नाही, तर स्किम VS स्कॅमची लढाई आहे, असे म्हणत श्रिकांत शिंदे यांनी यावेळी युपीए काळात झालेले भष्टाचार आणि NDA काळातील केली गेलेली विकास कामे अल्फाबेटिकली सांगित ABCD च वाचून दाखवली.

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनShrikant Shindeश्रीकांत शिंदेcongressकाँग्रेसManipur Violenceमणिपूर हिंसाचार