शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

विरोधकांनो माझ्यावर टीका करा पण, राष्ट्रीय सुरक्षेवरून राजकारण नको - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 04:59 IST

विरोधकांनी माझ्यावर जरूर टीका करा, मात्र राष्ट्रीय सुरक्षेवरून राजकारण नको, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले आहे.

नवी दिल्ली : विरोधकांनी माझ्यावर जरूर टीका करा, मात्र राष्ट्रीय सुरक्षेवरून राजकारण नको, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले आहे. हवाई दलाच्या ताफ्यात राफेल विमाने असती तर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी अधिक संहारक मारा करता आला असता असेही ते म्हणाले. राफेल विमान खरेदी प्रकरणावरून काँग्रेसने अनाठायी टीका चालविल्याचा आरोपही मोदी यांनी केला.ते म्हणाले की, भारतीय हवाई दलाला राफेल विमानांची उणीव जाणवत आहे. राफेल विमाने असती तर पाकिस्तानवर आणखी जोरदार हल्ले चढविता आले असते असे आता जनताच म्हणत आहे. याआधीच्या सरकारमधील स्वार्थी लोकांपायी देशाला आजवर खूप भोगावे लागले आहे. आता हेच लोक राफेल विमाने खरेदीवरून राजकारण करत आहेत. विरोधकांनी माझ्यावर जरूर टीका करावी. त्यासाठी त्यांना कोणीही अटकाव करणार नाही. आमच्या सरकारच्या चुकाही जरूर निदर्शनाला आणून द्याव्यात. मात्र राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील मुद्द्यांचा राजकारणासाठी वापर करू नये. त्यामुळे देशाचेच नुकसान होत आहे.राफेल विमान खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा व त्यात मोदी यांनी अनिल अंबानींना मोठा आर्थिक फायदा करून दिल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने करत आहेत. त्या आरोपांचा मोदी सरकारने याआधीच इन्कार केला आहे. मोदी म्हणाले की, काँग्रेसची सरकारे केंद्रात असताना संरक्षण व्यवहारांमध्ये अनेक घोटाळे झाले. त्या काळात जीपपासून ते शस्त्रे, पाणबुड्या, हेलिकॉप्टर्सच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याची फळे लष्कराला भोगावी लागली आहेत. प्रत्येक संरक्षण व्यवहारामधील दलाल कोणाचे निकटवर्तीय होते हे साऱ्या देशाला माहिती आहे. लष्करी जवानांसाठी माझ्या सरकारच्या कारकिर्दीत दोन लाख तीस हजार बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी करण्यात आली. या खरेदी प्रस्तावाकडे आधीच्या केंद्र सरकारने २००९ सालापासून दुर्लक्षच केले होते. माझ्या सत्ताकाळात संरक्षण व्यवहारातील दलालांनाच जागाच उरलेली नाही असाही दावा मोदी यांनी केला.>दहशतवादाचा एकजुटीने मुकाबला करूनरेंद्र मोदी यांनी पाटणा येथील सभेत रविवारी सांगितले की, मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र येऊया असा नारा विरोधी पक्षांनी दिला आहे. मात्र दहशतवादाचा मुकाबला एकजुटीने करूया असे माझे सर्वांना सांगणे आहे. बिहारमध्ये नितीशकुमार-भाजपा आघाडी सरकारने उत्तम काम केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९