शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

opinion poll : आज निवडणूक झाल्यास भाजपा बहुमत गमावणार, तरीही एनडीए सत्तेसमीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 22:40 IST

आज निवडणूक झाल्यास मतदाराचा कौल कुणाला मिळेल हे जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेमधून भाजपा बहुमत गमावणार अशी माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली -  17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी आज बिगुल वाजले आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी आपली मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे. त्या पार्श्वभूमीवर  एबीपी न्यूज आणि सी व्होटरने  आज निवडणूक झाल्यास मतदाराचा कौल कुणाला मिळेल हे जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेमधून भाजपा बहुमत गमावणार अशी माहिती समोर आली आहे. या सर्वेनुसार आज निवडणुक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 264 जागा तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 141 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर 19 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, एबीपी न्यूज आणि सीव्होटरच्या सर्व्हेनुसार आज निवडणूक झाल्यास कुठलाही पक्ष किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. या सर्व्हेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 265 जागा मिळतील. तर यूपीएला 141 जागा मिळतील. इतर पक्षांना 138 जागा मिळण्याची शक्यता आहे. पक्षनिहाय पाहिल्यास भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपाला 220 जागा मिळतील. तर काँग्रेसला 86 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.  दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 टक्के, तर यूपीएला 31 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांना 28 टक्के मतदान होण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी