शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 09:28 IST

India Pakistan War: भारतीय लष्कराने सांगितले की ७ मे ते १० मे दरम्यान नियंत्रण रेषेवर ३५-४० पाकिस्तानी सैन्य सैनिक मारले गेले. नऊ दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हल्ल्यात १०० दहशतवादी मारले गेले. यामध्ये पुलवामा हल्लेखोर आणि IC-814 चे अपहरणकर्ते यांचा समावेश होता. 

पाकिस्तानने अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारतासोबत शस्त्रसंधी करण्याची ऑफर दिली. भारताने ती स्वीकारली, परंतू त्याच सायंकाळी अंधार पडताच पाकिस्तानने पुन्हा दगाबाजी करत ड्रोन हल्ले केले. यानंतरची रविवारची रात्र शांततेत गेली आहे. यामागचे कारण समोर आले आहे. शस्त्रसंधीची चर्चा करणाऱ्या पाकिस्तानच्या डीजीएमओला आज भारताशी चर्चा करायची आहे. यामुळे जर आज हल्ला केला तर चर्चा कशी करणार, असा सवाल असल्याने पाकिस्तानने आज कोणताच हल्ला केलेला नसल्याचे समोर येत आहे. 

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाच्या एक दिवसानंतर भारतीय लष्कराने माध्यमांना माहिती दिली होती. सीमेवर सर्व काही सामान्य आहे. पाकिस्तानकडून कोणताही हल्ला झालेला नाही. गोळीबाराची कोणत्याही घटनेची नोंद झाली नाही, त्यामुळे अलिकडच्या काही दिवसांत ही पहिलीच शांत रात्र ठरली, असे लष्कराने म्हटले आहे. 

भारतीय लष्कराने सांगितले की ७ मे ते १० मे दरम्यान नियंत्रण रेषेवर ३५-४० पाकिस्तानी सैन्य सैनिक मारले गेले. नऊ दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हल्ल्यात १०० दहशतवादी मारले गेले. यामध्ये पुलवामा हल्लेखोर आणि IC-814 चे अपहरणकर्ते यांचा समावेश होता. 

दरम्यान आज दोन्ही देशांच्या डीजीएमओंची बैठक होणार आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेले समझोता पुढे कसा लागू ठेवायचा, स्थायी कसा बनवायचा यावर आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. पाकिस्तान पुन्हा या समझोत्याचे उल्लंघन करणार नाही आणि पुन्हा कोणतेही प्रक्षोभक पाऊल उचलणार नाही, अशी अपेक्षा संरक्षण तज्ज्ञ संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दुपारी १२ वाजता डीजीएमओ स्तरावरील चर्चा होणार आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Armyभारतीय जवान