शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:02 IST

Arvind Sawant Criticize Modi Government: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवरून आज लोकसभेमध्ये वादळी चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अरविंद सावंत यांनीही ऑपरेशन सिंदूरवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवरून आज लोकसभेमध्ये वादळी चर्चा सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेला सुरुवात करत संरक्षण दल आणि सरकारची बाजू मांडल्यानंतर आता विरोधी पक्षांकडून युद्धविरामासह विविध मुद्द्यांवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अरविंद सावंत यांनीही ऑपरेशन सिंदूरवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या मोहिमेला सिंदूर असं नाव देण हा भावनांशी केलेला खेळ आहे, अशी टीका सावंत यांनी केली. तसेच हल्ल्यानंतर एकाही देशाने भारताला साथ दिली नाही, असा मुद्दा अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

लोकसभेत सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, आम्ही वीर जवानांच्या शौर्याला नमन करतो. पण ऑपरेशन सिंदूरची जेव्हा चर्चा सुरू होते. तेव्हा या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव का ठेवलं, असा प्रश्न उपस्थित होतो. पहलगामची दुर्घटना घडली म्हणून या ऑपरेशनला सिंदूर असं नाव दिलं गेलं. मी काही काळ मंत्री होतो. एका कार्यक्रमानिमित्त काश्मीरमध्ये गेलो होते. तेव्हा पावलापावलावर जनाव तैनात केलेले होते. मात्र असं काह झालं की त्या दिवशी पहलगाममध्ये कुणीही सशस्त्र जवान तैनात नव्हता. पर्यटक आले असताना तिथे पोलीसही नव्हते. तिथे जवान तैनात नसतील असे आदेश का दिले गेले होते. इथून तपासाचा सुरुवात झाली पाहिजे.

आम्ही ढोल सैन्याच्या शौर्याचे वाजवू, पंतप्रधानांचे वाजवणार नाही. पंतप्रधानांनी असं काय शौर्य गायवलंय. पाकिस्तानने विनवणी केली म्हणून युद्धविराम केला गेला, असं आताही सांगितलं गेलं. मग बिनशर्त युद्धविराम का केला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपण युद्ध थांबलं असं रोजच सांगत असतात. जर पाकिस्तान शरण येत होता तर तुम्ही बिनशर्त युद्धविराम का स्वीकारला. पाकिस्तानवर अटी का लादल्या नाहीत. अटी लादायला हव्या होत्या. त्यानंतरही आपल्यावर हल्ले होत राहिले.

यावेळी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना अरविंद सावंत पुढे म्हणाले की, आपल्या शेजारचा एकही देश आपल्यासोबत बोलत नाही. आम्ही विश्वगुरू आहोत. पूर्ण जगभर फिरतो. आमचे पंतप्रधान दोनशे देशांमध्ये गेले. पाकिस्तानमधील दहशतवादाबाबत बोलतो. पण या संघर्षावेळी संपूर्ण जगातील एकही देश तुमच्यासोबत उभा राहिला नाही. इस्राइल आपल्यासोबत उभा राहिला आणि आपण आपल्याला तेलाचा पुरवठा करणाऱ्या इराणला दुखावलं. असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

केवळ पहलगामच नाही तर याआधीही आपण कारगिलमध्ये ऑपरेशन विजय राबवलं होतं. मात्र त्यानंतरही गलवानसारख्या घटना घडल्या, डोकलाम घडलं. सीमेवर घुसखोरी सुरू आहे. चीनकडून घुसखोरी होतेय. पाकिस्तानला या युद्धात कुणीकुणी मदत केली. चीन मदत करत होता. तुर्की ड्रोन पुरवत होता, त्यामुळे आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरArvind Sawantअरविंद सावंतlok sabhaलोकसभा