शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:02 IST

Arvind Sawant Criticize Modi Government: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवरून आज लोकसभेमध्ये वादळी चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अरविंद सावंत यांनीही ऑपरेशन सिंदूरवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवरून आज लोकसभेमध्ये वादळी चर्चा सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेला सुरुवात करत संरक्षण दल आणि सरकारची बाजू मांडल्यानंतर आता विरोधी पक्षांकडून युद्धविरामासह विविध मुद्द्यांवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अरविंद सावंत यांनीही ऑपरेशन सिंदूरवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या मोहिमेला सिंदूर असं नाव देण हा भावनांशी केलेला खेळ आहे, अशी टीका सावंत यांनी केली. तसेच हल्ल्यानंतर एकाही देशाने भारताला साथ दिली नाही, असा मुद्दा अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

लोकसभेत सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, आम्ही वीर जवानांच्या शौर्याला नमन करतो. पण ऑपरेशन सिंदूरची जेव्हा चर्चा सुरू होते. तेव्हा या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव का ठेवलं, असा प्रश्न उपस्थित होतो. पहलगामची दुर्घटना घडली म्हणून या ऑपरेशनला सिंदूर असं नाव दिलं गेलं. मी काही काळ मंत्री होतो. एका कार्यक्रमानिमित्त काश्मीरमध्ये गेलो होते. तेव्हा पावलापावलावर जनाव तैनात केलेले होते. मात्र असं काह झालं की त्या दिवशी पहलगाममध्ये कुणीही सशस्त्र जवान तैनात नव्हता. पर्यटक आले असताना तिथे पोलीसही नव्हते. तिथे जवान तैनात नसतील असे आदेश का दिले गेले होते. इथून तपासाचा सुरुवात झाली पाहिजे.

आम्ही ढोल सैन्याच्या शौर्याचे वाजवू, पंतप्रधानांचे वाजवणार नाही. पंतप्रधानांनी असं काय शौर्य गायवलंय. पाकिस्तानने विनवणी केली म्हणून युद्धविराम केला गेला, असं आताही सांगितलं गेलं. मग बिनशर्त युद्धविराम का केला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपण युद्ध थांबलं असं रोजच सांगत असतात. जर पाकिस्तान शरण येत होता तर तुम्ही बिनशर्त युद्धविराम का स्वीकारला. पाकिस्तानवर अटी का लादल्या नाहीत. अटी लादायला हव्या होत्या. त्यानंतरही आपल्यावर हल्ले होत राहिले.

यावेळी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना अरविंद सावंत पुढे म्हणाले की, आपल्या शेजारचा एकही देश आपल्यासोबत बोलत नाही. आम्ही विश्वगुरू आहोत. पूर्ण जगभर फिरतो. आमचे पंतप्रधान दोनशे देशांमध्ये गेले. पाकिस्तानमधील दहशतवादाबाबत बोलतो. पण या संघर्षावेळी संपूर्ण जगातील एकही देश तुमच्यासोबत उभा राहिला नाही. इस्राइल आपल्यासोबत उभा राहिला आणि आपण आपल्याला तेलाचा पुरवठा करणाऱ्या इराणला दुखावलं. असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

केवळ पहलगामच नाही तर याआधीही आपण कारगिलमध्ये ऑपरेशन विजय राबवलं होतं. मात्र त्यानंतरही गलवानसारख्या घटना घडल्या, डोकलाम घडलं. सीमेवर घुसखोरी सुरू आहे. चीनकडून घुसखोरी होतेय. पाकिस्तानला या युद्धात कुणीकुणी मदत केली. चीन मदत करत होता. तुर्की ड्रोन पुरवत होता, त्यामुळे आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरArvind Sawantअरविंद सावंतlok sabhaलोकसभा