शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 06:34 IST

Operation Sindoor: पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्यांचा बदला घेण्याचा संकल्प केला असला तरी, त्यांचे हल्ले भारताला धडा शिकवण्यासाठीच्या घोषणेप्रमाणे प्रत्युत्तरात्मक नाहीत.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करून या संघर्षात विजयाचा दावा करत असताना, संयम दाखवण्याची चिन्हे देखील दिसत आहेत. पाकिस्तानने गुरुवारी रात्री २६ भारतीय ठिकाणांवर ३०० ते ४०० ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आणि बठिंडा लष्करी तळाला लक्ष्य केले, तेव्हाही भारताची प्रतिक्रिया संयमाची होती. असा अंदाज आहे की, तणाव कमी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते.

भारताने याबाबत जी अधिकृत माहिती दिली त्यावेळीही कठोर शब्द वापरले नाहीत. या हल्ल्यांमध्ये काही सैनिक शहीद झाल्याचे मान्य केले. भारताच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचेही मोठे लष्करी नुकसान झाले आणि त्यांचेही काही जवान मारले गेले. तरीही हल्ल्यांमध्ये एक मर्यादा रेषा आहे. ती अशी की, दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नाही. 

पाकिस्तानला वेळ आणि संधीशुक्रवारीही भारताने पाकिस्तानच्या चुकीच्या कारवायांना प्रत्युत्तर देताना प्रचंड संयम दाखवला आहे आणि असे सूचित केले आहे की, ते शेजारी देशाला लष्करी कारवाईचा मार्ग सोडून देण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी देत आहे. 

आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्यांचा बदला घेण्याचा संकल्प केला असला तरी, त्यांचे हल्ले भारताला धडा शिकवण्यासाठीच्या घोषणेप्रमाणे प्रत्युत्तरात्मक नाहीत. पाकिस्तानने काही प्रमाणात उल्लंघन केले असले तरीही दोघांनीही अधिकृतपणे सांगितले आहे की, त्यांनी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे आणि मोठे नुकसान केले आहे. भारताची ५ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे; परंतु दाव्याला दुजोरा देणारा कोणताही पुरावा नाही. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर