शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 06:34 IST

Operation Sindoor: पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्यांचा बदला घेण्याचा संकल्प केला असला तरी, त्यांचे हल्ले भारताला धडा शिकवण्यासाठीच्या घोषणेप्रमाणे प्रत्युत्तरात्मक नाहीत.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करून या संघर्षात विजयाचा दावा करत असताना, संयम दाखवण्याची चिन्हे देखील दिसत आहेत. पाकिस्तानने गुरुवारी रात्री २६ भारतीय ठिकाणांवर ३०० ते ४०० ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आणि बठिंडा लष्करी तळाला लक्ष्य केले, तेव्हाही भारताची प्रतिक्रिया संयमाची होती. असा अंदाज आहे की, तणाव कमी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते.

भारताने याबाबत जी अधिकृत माहिती दिली त्यावेळीही कठोर शब्द वापरले नाहीत. या हल्ल्यांमध्ये काही सैनिक शहीद झाल्याचे मान्य केले. भारताच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचेही मोठे लष्करी नुकसान झाले आणि त्यांचेही काही जवान मारले गेले. तरीही हल्ल्यांमध्ये एक मर्यादा रेषा आहे. ती अशी की, दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नाही. 

पाकिस्तानला वेळ आणि संधीशुक्रवारीही भारताने पाकिस्तानच्या चुकीच्या कारवायांना प्रत्युत्तर देताना प्रचंड संयम दाखवला आहे आणि असे सूचित केले आहे की, ते शेजारी देशाला लष्करी कारवाईचा मार्ग सोडून देण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी देत आहे. 

आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्यांचा बदला घेण्याचा संकल्प केला असला तरी, त्यांचे हल्ले भारताला धडा शिकवण्यासाठीच्या घोषणेप्रमाणे प्रत्युत्तरात्मक नाहीत. पाकिस्तानने काही प्रमाणात उल्लंघन केले असले तरीही दोघांनीही अधिकृतपणे सांगितले आहे की, त्यांनी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे आणि मोठे नुकसान केले आहे. भारताची ५ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे; परंतु दाव्याला दुजोरा देणारा कोणताही पुरावा नाही. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर