शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 07:50 IST

India Air Strike On Pakistan: भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय या नऊ लक्ष्यांना लक्ष्य करण्यात आलं. हे दोन्हीही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहेत.

India Air Strike On Pakistan: भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलाय. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि दक्षिण आशियातील तज्ज्ञ मायकेल कुगेलमन यांनी, यावेळी भारतानं पाकिस्तानवर अधिक जोरदार हल्ला चढवला असल्याचं म्हटलं. तसंच अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील परिस्थिती २०१९ पेक्षाही खराब होऊ शकते, असंही ते म्हणाले. २०१९ मध्ये भारतानं अनेक भागात हवाई हल्ले करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.

वूड्रो विल्सन इंटरनॅशनल सेंटर फॉर स्कॉलर्समधील साऊथ एशिया इन्स्टिट्यूटचे संचालक कुगेलमन यांनी ऑपरेशन सिंदूरनंतरचा तणाव २०१९ पेक्षा अधिक गंभीर असल्याचं म्हटलं. भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा आहे. पाकिस्तानने प्रत्युत्तराचा दावा केला असून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चर्चा आहे. यावरून दोन्ही देश २०१९ च्या संकटातून पुढे गेल्याचं दिसून येत असल्याचं ते म्हणाले.

रात्री पाकिस्तानवर हल्ला

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्करानं पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हे लष्करी हल्ले करण्यात आल्याची माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. जिथून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती, त्या पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं जोरदार हल्ला करत ते नष्ट केले. 

पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही, असं भारतीय लष्करानं स्पष्ट केलंय. बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय या नऊ लक्ष्यांना लक्ष्य करण्यात आलं. हे दोन्हीही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना 'युद्धाची कारवाई' असं म्हटलं असून आपल्या देशाला चोख प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगितलं. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली आणि मुजफ्फराबाद आणि बहावलपूर येथे क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल