शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 07:50 IST

India Air Strike On Pakistan: भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय या नऊ लक्ष्यांना लक्ष्य करण्यात आलं. हे दोन्हीही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहेत.

India Air Strike On Pakistan: भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलाय. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि दक्षिण आशियातील तज्ज्ञ मायकेल कुगेलमन यांनी, यावेळी भारतानं पाकिस्तानवर अधिक जोरदार हल्ला चढवला असल्याचं म्हटलं. तसंच अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील परिस्थिती २०१९ पेक्षाही खराब होऊ शकते, असंही ते म्हणाले. २०१९ मध्ये भारतानं अनेक भागात हवाई हल्ले करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.

वूड्रो विल्सन इंटरनॅशनल सेंटर फॉर स्कॉलर्समधील साऊथ एशिया इन्स्टिट्यूटचे संचालक कुगेलमन यांनी ऑपरेशन सिंदूरनंतरचा तणाव २०१९ पेक्षा अधिक गंभीर असल्याचं म्हटलं. भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा आहे. पाकिस्तानने प्रत्युत्तराचा दावा केला असून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चर्चा आहे. यावरून दोन्ही देश २०१९ च्या संकटातून पुढे गेल्याचं दिसून येत असल्याचं ते म्हणाले.

रात्री पाकिस्तानवर हल्ला

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्करानं पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हे लष्करी हल्ले करण्यात आल्याची माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. जिथून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती, त्या पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं जोरदार हल्ला करत ते नष्ट केले. 

पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही, असं भारतीय लष्करानं स्पष्ट केलंय. बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय या नऊ लक्ष्यांना लक्ष्य करण्यात आलं. हे दोन्हीही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना 'युद्धाची कारवाई' असं म्हटलं असून आपल्या देशाला चोख प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगितलं. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली आणि मुजफ्फराबाद आणि बहावलपूर येथे क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल