शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

१०-१२ नाही तर तब्बल २८ ठिकाणी भारताने केला हल्ला, विव्हळणाऱ्या पाकिस्तानने स्वत: दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:43 IST

Operation Sindoor:

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या सैन्यदलांनी  ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले होते. तसेच भारताच्या या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांना उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानला जबरदस्त हादरा बसला होता. तसेच पाकिस्तानच्या लष्कराने युद्धविरामासाठी विनवणी सुरू केली होती. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानवर केलेल्या जबर आघाताची कबुली आता पाकिस्ताननेच दिली आहे.

पाकिस्तानकडून तयार करण्यात आलेल्या ऑपरेशन बुनयान उन मर्सूससंबंधित कागदपत्रांमधील उल्लेखानुसार भारताने पाकिस्तानमधील आणखी आठ ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. या ठिकाणांचा उल्लेख भरातीय हवाई दल आणि डीजीएमओ यांनी ७ मे रोजी करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलेला नाही.

पाकिस्तानने तयार केलेल्या कागदपत्रांमध्ये ज्या शहरांवर हल्ला झाल्याचा नव्याने उल्लेख करण्यात आला आहे, त्यामध्ये पेशावर, झंग, सिंधमधील हैदराबाद, पंजाब प्रांतातील गुजरात, गुजरांवाला, बहावलनगर, अटक आणि छोर यांचा समावेश आहे. या भागात हल्ला झाल्याचे डोजियरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशामधून समोर आलं आहे. त्यामाध्यमातून भारताने केलेल्या हल्ल्याची तीव्रता लक्षात येते. भारताने या कारवाईसाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. तसेच या क्षेपणास्त्रांसमोर पाकिस्तानी सैन्य हतबल झाल्याचं दिसून आलं होतं.

नव्याने समोर आलेल्या या माहितीमुळे भारतीय सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेली कारवाई ही आधी वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजांपेक्षा अधिक व्यापक आणि तीव्र असल्याचे स्पष्ट  झाले आहे. तसेच या माहितीमुळे पाकिस्तानकडून भारताला झालेल्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानाबाबत करण्यात येत असलेला दावाही खोटा असल्याचे उघड झाले आहे.

  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत प्रत्युत्तरदाखल कारवाई केली होती. तेव्हा भारतीय सैन्यदलांकडून बहावलपूर येथील जैश ए मोहम्मदचा अड्डा, मुरिदके येथील लष्कर ए तोयबा याचं प्रशिक्षण केंद्र यांना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तसेच मुझफ्फराबाद, कोटली, रावलकोट, चाकस्वारी, भिंबर, नीलम खोरे, झेलम आणि चकवाल येथील अड्ड्यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न झाल्यावर भारताने पाकिस्तानी हवाई दलाच्या नूर खान, रफिकी, मुरिद, सुक्कूर, सियालकोट, पसरूर, चुन्नियन, सरगोधा, स्कर्दू, भोलारी आणि जेकोबाबाद या हवाई तळांना लक्ष्य करत मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवला होता. त्यामुळे पाकिस्तानला तीन दिवसांच्या आतच युद्धविरामासाठी विनवणी करावी लागली होती.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान