शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:32 IST

Operation Sindoor :

गेल्या महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल रात्री भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर तुफानी एअर स्ट्राईक करत ददहशवादी आणि पाकिस्तानला जबर दणका दिला आहे. या कारवाईनंतर देशभरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि उत्तर प्रदेशमधील सहारनपूरचे खासदार इम्रान मसूद यांनी या एअर स्ट्राईकबाबत मोठं विधान केलं आहे. 

इम्रान मसूद म्हणाले की, पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करणाऱ्या भारतीय लष्कराला सलाम, अशाच प्रकारे प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता होती. मात्र किती दहशतवादी मारले गेले आणि किती नुकसान झाले, याचीही माहिती घोषणा करून दिली पाहिजे. तेव्हा आमचं काळीज थंड होईल.आम्ही वारंवार सांगिलं आहे की, आम्ही सरकारसोबत आहोत. तसेच दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, आम्ही सरकारला स्पष्टच सांगितलं होतं की, यावेळी केवळ सारवासारव चालणार नाही. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. आता ती कारवाई झाली आहे. त्यासाठी लष्कराला सलाम. ज्यांनी पहलगाम येथे हल्ला केला. त्या दहशतवाद्यांच्या तळांवरचे किती दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले पाहिजेत, याचीही माहिती समोर आली पाहिजे. तेव्हाच मनाला शांतात मिळेल, असे त्यांनी सांगितले.

इम्रान मसूद पुढे म्हणाले की, दहशतवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत आपण आत थांबता कामा नये. दहशतवादाला मुळापासून संपवलं पाहिजे. जेणेकरून आपल्या देशात दहशतवादी हल्ला करण्याची हिंमत कुणीही करू शकणार नाही. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतcongressकाँग्रेस