शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:17 IST

माजी सैनिक सुखविंदर पाल म्हणाले की, आम्ही यापूर्वीही देशाची सेवा केली आहे, आताही गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही. हे गाव आमचं आहे, देश आमचा आहे.

पंजाब, काश्मीर आणि जम्मूच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये गोळीबाराचा आवाज येत असला तरी तिथे राहणारे लोक घाबरले नाहीत. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याच्या ते तयारीत आहेत. हल्ला झाल्यास नेमकं काय करायचं हे महिला त्यांच्या मुलांना शिकवत आहेत आणि माजी सैनिक तरुणांना देश आधी येतो, मग सर्व काही... हे समजावून सांगत आहेत. "आम्ही गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू" असा निर्धार पंजाबपासून काश्मीरपर्यंत करण्यात आला आहे. 

फिरोजपूर सीमेवरील महवा गावातील लोकांनी आजतकने संवाद साधला. लोक म्हणाले की १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही आम्ही कुठेही गेलो नाही. यावेळीही जाणार नाही. जवानांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे त्याच्यासोबत आम्ही उभे आहोत. जे काही लागेल ते आम्ही करू - अगदी आमचा जीवन देऊ. गावच्या सरपंच निर्मला देवी यांनी आधीच गावकऱ्यांना घरी रेशन आणि पाणी साठवून ठेवण्यास सांगितलं आहे आणि मुलांना कठीण परिस्थितीत काय करावे हे शिकवण्यास सांगितलं आहे. युद्ध झालं तरी आम्ही गाव सोडणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं आहे असं म्हटलं. 

"पाकिस्तान आपल्याला हादरवू शकत नाही"

माजी सैनिक सुखविंदर पाल म्हणाले की, आम्ही यापूर्वीही देशाची सेवा केली आहे, आताही गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही. हे गाव आमचं आहे, देश आमचा आहे - पाकिस्तान आपल्याला हादरवू शकत नाही. उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी हल्ल्यांनंतरही गावांमध्ये भीतीचे वातावरण नाही. लोक सामान्य जीवन जगत आहेत. एका स्थानिक ग्रामस्थाने सांगितलं की पाकिस्तान कधीही जिंकला नाही, आता तो हॅटट्रिक करेल. पाकिस्तानला काश्मीरमध्ये शांतता आवडत नाही, म्हणूनच तो हल्ला करत आहे, पण आम्ही आमच्या सैन्यासोबत आहोत तेही पूर्ण ताकदीने.

"हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ”

फिरोजपूरचे शेतकरी म्हणतात की ही आमची जमीन आहे, पण आम्हाला भीती वाटत नाही. आम्ही सैन्यासोबत आहेत. आपण आधी संकटाचा सामना करतो. आम्हाला माघार कशी घ्यायची हे माहित नाही. बोट चालवणाऱ्या गावकऱ्याने सांगितलं की, आम्हाला पाकिस्तानच्या कारवायांची भीती वाटत नाही. गरज पडली तर आपण बोट सोडून बंदूक उचलू. हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ असं लोक म्हणत आहेत. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPunjabपंजाब