शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:27 IST

उत्तरेकडील सवाई नाला आणि दक्षिणेकडील बहावलपूर येथे जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर आहे. तिथेही भारतीय सैन्याने हल्ला केला असं कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटलं.

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानीदहशतवादी तळांवर हल्ले केले. रात्री १ वाजून ०५ मिनिटांपासून ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर भारतीय सशस्त्र दलाने हाती घेतले. या ऑपरेशनमध्ये कुठेही निर्दोष नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली अशी माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले.

नवी दिल्लीत भारतीय सैन्याने पत्रकार परिषद घेत हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. या हल्ल्याबाबत भारतीय सैन्याच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटलं की, ऑपरेशन सिंदूर २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना न्याय देण्यासाठी घेतले गेले. या कारवाईत ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. मार्च २०२५ मध्ये जम्मू काश्मीर येथे ४ जवानांची हत्या केली होती. त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ट्रेनिंग दिले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवादी तळांनाही ऑपरेशन सिंदूरमध्ये टार्गेट करण्यात आले असं त्यांनी सांगितले.

तसेच मरकज सुभानअल्लाह जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होते. याठिकाणीही दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले जायचे. ऑपरेशन सिंदूरमध्ये कुठल्याही सैन्य ठिकाणांना टार्गेट केले नाही, कुठल्याही नागरिकाला इजा झाली नाही. मागील ३ दशकांपासून पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे. तिथे दहशतवादी कॅम्प आणि लॉन्चपॅड्स बनवले होते. उत्तरेकडील सवाई नाला आणि दक्षिणेकडील बहावलपूर येथे जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर आहे. तिथेही भारतीय सैन्याने हल्ला केला असं कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटलं.

दरम्यान, हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित करत हल्ल्याची माहिती दिली. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूर आखण्यात आले. पाकिस्तानच्या मुजफ्फराबाद इथल्या लश्करच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी याच ठिकाणी प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी भारताने ही कारवाई केली. बरनाला कॅम्प, सियालकोट येथील महमूना कॅम्प नष्ट करण्यात आले आहे असं व्योमिका सिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला