शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? काही आमदार रायपूरमध्ये, राजकीय हालचालींना वेग, आमदारांसाठी दोन दिवसांचे बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 07:13 IST

Operation Lotus: झारखंडमध्ये लाभाचे पद प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याच्या शक्यतेने महाआघाडीच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची भीती सतावते आहे.

- एस. पी. सिन्हारांची : झारखंडमध्ये लाभाचे पद प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याच्या शक्यतेने महाआघाडीच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची भीती सतावते आहे. महाराष्ट्रात अलीकडेच शिवसेनेत झालेल्या फुटीपासून धडा घेऊन महाआघाडीच्या आमदारांना काँग्रेसशासित छत्तीसगढमध्ये नेण्यात आले आहे. रायपूरमध्ये जाणाऱ्यांमध्ये यूपीएच्या अनेक आमदारांचा समावेश आहे. तथापि, या आमदारांबरोबर मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच झामुमोचे काही आमदार गेलेले नाहीत.

यूपीएच्या ३२ आमदारांसह ३५ नेते रांची विमानतळावरून विशेष विमानाने रायपूरकडे रवाना झाले. यात सत्ताधारी झामुमोचे १९, काँग्रेसचे १२ व राजदच्या एका आमदाराचा समावेश आहे. याबरोबरच काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर व संतोष पांडेय यांचाही त्यात समावेश आहे. महाआघाडीत कोणत्याही प्रकारची फूट पडू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. 

रायपूरमध्ये मेफेअर गोल्ड रिसॉर्टमध्ये आमदारांसाठी दोन दिवसांचे बुकिंग करण्यात आले आहे. हॉटेलला हाय सिक्युरिटी झोन जाहीर करण्यात आले आहे. तेथे एक डीएसपी व दोन पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तथापि, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सध्या रांचीमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याबाबत गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे. 

खुर्चीची लालसा  नाही - सोरेनझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणतेही अघटित घडणार नाही. कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधारी तयार आहेत. अनेक वेळा रणनीतीनुसार काम केले जाते. त्याची छोटीशी झलक आपण पाहिली. मला खुर्चीची लालसा नाही, त्यामुळे तणाव नाही.

हवाईमार्गे छत्तीसगढमध्येयूपीए आमदारांना छत्तीसगढमध्ये नेले जाईल, अशी चर्चा होती. तथापि, त्या दिवशी तीन बसमधून यूपीए आमदारांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबरोबर खुंटी जिल्ह्यातील लतरातू धरणावर नेण्यात आले होते. खुंटी, नेतरहाटमार्गे हे सर्व आमदार छत्तीसगढमध्ये जातील, अशी चर्चा होती. परंतु त्यावेळी तसे न हाेता मंगळवारी आमदारांना हवाईमार्गे नेण्यात आले.

nराज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना सत्ताधारी आमदार राज्याबाहेर जात आहेत, हे विशेष. एकीकडे दुमकामध्ये अंकिता हिला जिवंत जाळण्याच्या टनेबद्दल आक्रोश आहे. या घटनांमुळे भाजपने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

झारखंडचा ‘महाराष्ट्र’ होणार नाही : अविनाश पांडेनवी दिल्ली : आमदारांना आमिष दाखवून महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यात भाजपला यश आले. त्याप्रमाणे ‘ऑपरेशन लोटस’ झारखंडमध्ये यशस्वी होणार नाही, असा दावा काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी व माजी खासदार अविनाश पांडे यांनी केला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विधानसभा सदस्यत्वाबद्दल वाद उत्पन्न झाला आहे. यासंदर्भात झारखंडच्या राज्यपालांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. परंतु झारखंडमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ करण्याचा निश्चय भाजपने केल्याचा दावा अविनाश पांडे यांनी केला आहे. यूपीएचे सारे आमदार एकजूट असल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपा