शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? काही आमदार रायपूरमध्ये, राजकीय हालचालींना वेग, आमदारांसाठी दोन दिवसांचे बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 07:13 IST

Operation Lotus: झारखंडमध्ये लाभाचे पद प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याच्या शक्यतेने महाआघाडीच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची भीती सतावते आहे.

- एस. पी. सिन्हारांची : झारखंडमध्ये लाभाचे पद प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याच्या शक्यतेने महाआघाडीच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची भीती सतावते आहे. महाराष्ट्रात अलीकडेच शिवसेनेत झालेल्या फुटीपासून धडा घेऊन महाआघाडीच्या आमदारांना काँग्रेसशासित छत्तीसगढमध्ये नेण्यात आले आहे. रायपूरमध्ये जाणाऱ्यांमध्ये यूपीएच्या अनेक आमदारांचा समावेश आहे. तथापि, या आमदारांबरोबर मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच झामुमोचे काही आमदार गेलेले नाहीत.

यूपीएच्या ३२ आमदारांसह ३५ नेते रांची विमानतळावरून विशेष विमानाने रायपूरकडे रवाना झाले. यात सत्ताधारी झामुमोचे १९, काँग्रेसचे १२ व राजदच्या एका आमदाराचा समावेश आहे. याबरोबरच काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर व संतोष पांडेय यांचाही त्यात समावेश आहे. महाआघाडीत कोणत्याही प्रकारची फूट पडू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. 

रायपूरमध्ये मेफेअर गोल्ड रिसॉर्टमध्ये आमदारांसाठी दोन दिवसांचे बुकिंग करण्यात आले आहे. हॉटेलला हाय सिक्युरिटी झोन जाहीर करण्यात आले आहे. तेथे एक डीएसपी व दोन पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तथापि, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सध्या रांचीमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याबाबत गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे. 

खुर्चीची लालसा  नाही - सोरेनझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणतेही अघटित घडणार नाही. कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधारी तयार आहेत. अनेक वेळा रणनीतीनुसार काम केले जाते. त्याची छोटीशी झलक आपण पाहिली. मला खुर्चीची लालसा नाही, त्यामुळे तणाव नाही.

हवाईमार्गे छत्तीसगढमध्येयूपीए आमदारांना छत्तीसगढमध्ये नेले जाईल, अशी चर्चा होती. तथापि, त्या दिवशी तीन बसमधून यूपीए आमदारांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबरोबर खुंटी जिल्ह्यातील लतरातू धरणावर नेण्यात आले होते. खुंटी, नेतरहाटमार्गे हे सर्व आमदार छत्तीसगढमध्ये जातील, अशी चर्चा होती. परंतु त्यावेळी तसे न हाेता मंगळवारी आमदारांना हवाईमार्गे नेण्यात आले.

nराज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना सत्ताधारी आमदार राज्याबाहेर जात आहेत, हे विशेष. एकीकडे दुमकामध्ये अंकिता हिला जिवंत जाळण्याच्या टनेबद्दल आक्रोश आहे. या घटनांमुळे भाजपने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

झारखंडचा ‘महाराष्ट्र’ होणार नाही : अविनाश पांडेनवी दिल्ली : आमदारांना आमिष दाखवून महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यात भाजपला यश आले. त्याप्रमाणे ‘ऑपरेशन लोटस’ झारखंडमध्ये यशस्वी होणार नाही, असा दावा काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी व माजी खासदार अविनाश पांडे यांनी केला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विधानसभा सदस्यत्वाबद्दल वाद उत्पन्न झाला आहे. यासंदर्भात झारखंडच्या राज्यपालांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. परंतु झारखंडमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ करण्याचा निश्चय भाजपने केल्याचा दावा अविनाश पांडे यांनी केला आहे. यूपीएचे सारे आमदार एकजूट असल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपा