शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राम मंदिर होण्याचा मार्ग मोकळा; सुन्नी वक्फ बोर्डाने फेरविचार याचिका दाखल न करण्याचा निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 21:38 IST

आता अयोध्येत कुठल्याही वादाशिवाय राम मंदिर होण्याचा होण्याचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल न करण्याचा सुन्नी वक्फ बोर्डाने निर्णय आज घेतला आहे.या याचिकेमुळे मुस्लिम समाजाचे नुकसानच होईल, अशी भीती मान्यवरांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली होती.

नवी दिल्ली - अयोध्या राम जन्मभूमी वादविवाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल न करण्याचा सुन्नी वक्फ बोर्डाने निर्णय आज घेतला आहे. त्यामुळे आता अयोध्येत कुठल्याही वादाशिवाय राम मंदिर होण्याचा होण्याचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे.काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये झालेल्या बैठकीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने अयोध्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करणार असे सांगितले होते. यावरून सुन्नी वक्फ बोर्डाच्या सदस्यांमध्ये मतभेद होते. फेरविचार याचिका दाखल करावी असे काही सदस्यांना वाटत होते. यामुळे मुस्लिम समाजात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा, अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह मुस्लिम समाजातील १०० मान्यवरांनी आपल्या सह्यांसह निवेदन देऊन फेरविचार याचिकेला विरोध दर्शवला होता. या याचिकेमुळे मुस्लिम समाजाचे नुकसानच होईल, अशी भीती मान्यवरांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली होती. गेल्या अनेक वर्षांच्या कटू अनुभवातून आपण काहीच शिकलो नाही का, असा प्रश्नही मान्यवरांनी केला होता. त्यामुळे  सुन्नी वक्फ बोर्डाची आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. अध्यक्षांसह बोर्डाचे आठ पैकी सात सदस्य बैठकीला उपस्थित होते. त्यात फेरविचार याचिका दाखल न करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याShabana ajhamiशबाना आझमीNaseeruddin Shahनसिरुद्दीन शाहSupreme Courtसर्वोच्च न्यायालय