शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

... तरच बंगाली भाषिक मुस्लीम मूलनिवासी मानले जातील, आसामचे मुख्यमंत्री सरमा यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 09:14 IST

बंगाली भाषिक मुस्लिम आसामी प्रथा पाळू शकत असतील तर त्यांनाही ‘स्वदेशी’ मानले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गुवाहाटी : बंगाली भाषिक मुस्लिमांना बालविवाह व बहुपत्नीत्व यांसारख्या प्रथा सोडून द्याव्या लागतील, तरच त्यांना ‘खिलोंजिया’ म्हणजे राज्यातील मूळ रहिवासी मानले जाईल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी म्हटले आहे.

‘बंगाली भाषिक मुस्लिम मूळ रहिवासी आहेत की नाही हा वेगळा मुद्दा आहे. आम्ही काय म्हणतोय की जर त्यांना ‘मूल निवासी’ व्हायचे असेल तर आम्हाला काही अडचण नाही. पण त्यासाठी त्यांनी बालविवाह व बहुपत्नीत्व सोडून द्यायला हवे व महिलांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करायला हवे. आसामी लोकांची एक संस्कृती आहे. त्यात मुलींची तुलना देवतांशी केली जाते. दोन-तीन वेळा लग्न करणे ही आसामी संस्कृती नाही,’ असे सरमा म्हणाले. 

मी त्यांना नेहमी सांगतो, तुम्ही स्वदेशी असण्यात काही अडचण नाही, पण त्यांना दोन-तीन बायका असू शकत नाहीत. ही आसामी संस्कृती नाही. सत्र (वैष्णव मठ) जमिनीवर अतिक्रमण करून एखादा स्वदेशी कसा होऊ शकतो? बंगाली भाषिक मुस्लिम आसामी प्रथा पाळू शकत असतील तर त्यांनाही ‘स्वदेशी’ मानले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Assamआसाम