शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

एनडीए सरकारनेच दलित, वंचितांना योग्य सन्मान दिला - पंतप्रधान मोदी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 06:22 IST

भ्रष्टाचाऱ्यांविरुद्धची कारवाई चालूच राहील आणि निर्वासितांचा प्रश्न मार्गी लावणार, असे मोदी म्हणाले.

विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचे ऋणी आहोत, कारण त्यामुळेच आपल्याला तळागाळापासून येथपर्यंत येता आले. आपल्या नेतृत्वाखालील एनडीएनेच दलित, वंचितांना सन्मान दिला, असे प्रतिपादन करीत भाजपला राज्यघटना रद्द करायची आहे, या विरोधकांच्या आरोपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार खंडन केले.

बिहारच्या गया आणि पूर्णिया जिल्ह्यांमध्ये निवडणूक सभांना संबोधित करताना मोदी यांनी शाळांपासून सर्वोच्च न्यायालय आणि संसदेपर्यंत संविधान दिन साजरा करणे यांसारख्या केंद्र सरकारच्या उपक्रमांचा उल्लेख केला. भ्रष्टाचाऱ्यांविरुद्धची कारवाई चालूच राहील आणि निर्वासितांचा प्रश्न मार्गी लावणार, असेही ते म्हणाले.

एनडीएचे उमेदवार जीतन राम मांझी यांच्या समर्थनार्थ गया येथील सभेत मोदी म्हणाले, आरजेडी हा बिहारमधील जंगलराजचा चेहरा आहे. कंदीलवाले हे लोक तुम्हाला आधुनिक युगात जाऊ देणार नाहीत. कंदील लावून मोबाइल चार्ज होईल का?  आरजेडीने बिहारला दोनच गोष्टी दिल्या, पहिला भ्रष्टाचार आणि दुसरे जंगलराज. काही लोकांनी तुष्टीकरणासाठी राम मंदिराचे निमंत्रण नाकारले. आम्ही शक्तीचे उपासक आहोत. ही शक्ती कोणीही नष्ट करू शकत नाही. घमेंडखोर आघाडीच्या लोकांना भगवान राम यांची अडचण होते, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. 

‘तृणमूल घुसखोरांना संरक्षण देते, सीएएला विरोध करते’बालूरघाट (प. बंगाल) : तृणमूल काँग्रेस घुसखोरांना संरक्षण देते, परंतु निर्वासितांना नागरिकत्व देणाऱ्या ‘सीएए’ कायद्याला विरोध करते, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी येथील सभेत मंगळवारी केली. विश्व हिंदू परिषदेला (व्हीएचपी) हावडा येथे श्रीरामनवमी मिरवणूक काढण्याची परवानगी दिल्याबद्दल कोलकाता उच्च न्यायालयाच्या निकालाला त्यांनी सत्याचा विजय म्हटले. संदेशखाली येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Biharबिहारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४