शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

"देशात केवळ एकच गॅरंटी, नरेंद्र मोदी यांची गॅरंटी अन्..."; 3 राज्यांतील बंपर विजयानंतर जेपी नड्डा स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 20:11 IST

"देशात कोणतीही निवडणूक असो अथवा कुठलेही काम असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पुढाकार नेतृत्व केले आहे. नेहमीच ते पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे.

देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तलंगणामध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या राज्यांपैकी राजस्थान, मध्येप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बंपर विजय मिळाला आहे. यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभिनंदन करत, "देशात केवळ एकच गॅरंटी आहे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच गॅरंटी. हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे," असे जेपी नड्डा यांनी म्हटले आहे. ते दिल्ली येथील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

नड्डा म्हणाले, "देशात कोणतीही निवडणूक असो अथवा कुठलेही काम असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पुढाकार नेतृत्व केले आहे. नेहमीच ते पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे. असे आपले यशस्वी पंतप्रधान आहेत. या निवडणुकांच्या निकालांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, गाव, गरीब, वंचित, पीडित, शोषित, आदीवासी बंधी. यांना कुणी सन्मानाने मुख्य प्रवाहात आणू शकतो, तर ते दुसरे  तिसरे कुणी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. यावर या सर्वांना विश्वास आहे."

देशात केवळ एकच गॅरंटी -"देशात केवळ एकच गॅरंटी आहे, ती म्हणजे नरेंद्र मोदी यांचीच गॅरंटी आहे. हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे. हे निकाल आणखी एक संदेश देतात, ती म्हणजे, मोदी है तो मुमकीन हे. हेही आपल्याला स्पष्टपणे दिसते," अशा शब्दात नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशन्सा केली.

मोदीचा विकासाचा मुद्दा ठरला भारी - नड्डा म्हणाले, "मित्रांनो, या निवडणुकीतून आणखी एक संदेश मिळतो, इंडिया अलायन्सने ज्या पद्धतीने जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने समाज खंडित करण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि तुष्टिकरणाचे राजकारण पुढे नेण्याचे काम केले. यावर मोदीजींच्या विकासाचा मुद्दा भारी ठरला आहे. हेही आपण लक्षात ठेवायला हवे. देशाने विकासाला समोर ठेवून या निवडणूक निकालांवर मोहर उमटवली आहे."

...पण  हे विसरतात की, देशाचे पंतप्रधान औबीसी समुदायातील आहेत -इंडिया अलायन्सने ओबीसीच्या घोषणा देत आहेत. पण  हे विसरतात की, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औबीसी समुदायातील आहेत. सर्वांच्या विकासाचा प्रण करून, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या पुढे नेण्याचे काम केले आहे. मात्र, काँग्रेसच्या लोकांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींसंदर्भात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरले, तेव्हा त्यांना कळले नाही का, की मोदीजींसाठी वापरलेले अपशब्द म्हणजे, ओबीसी समाजावर भाष्य करण्यासारखे आहे? असा सवालही यावेळी नड्डा यांनी केला.

रणनीती पडद्याआडचा विषय असतो -भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून, या यशासाठी मी राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणाच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. याच बरोबर मी आमच्या लाखो कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो. मला पत्रकार विचारत होते की, रणणिती काय आहे? मी म्हणत होतो, रणनीती पडद्याआडचा विषय असतो. ती वेळेवरच समोर येते. माझ्या कार्यकरत्यांनी ही रणनीती अगदी योग्य पद्धतीने अंममलबजावणी केली. त्यांचे मोठे योगदान आहे. त्यासाठीही मी त्यांचे अभिनंदन करतो. आम्हाला समाजाच्या सर्वस्थरांतून मतदान झाले आहे, असेही जपी नड्डा यांनी म्हणाले.

 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३