शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

कायद्याचे शिक्षण दर्जेदार असेल तरच देशात कायद्याचे राज्य येणार- सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 23:19 IST

देशात कायद्याचे राज्य आणणे हे सर्वस्वी तेथील कायदा शिक्षणाच्या एकूण दर्जावर अवलंबून आहे, असे मत सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी शनिवारी व्यक्त केले.

नवी दिल्ली : देशात कायद्याचे राज्य आणणे हे सर्वस्वी तेथील कायदा शिक्षणाच्या एकूण दर्जावर अवलंबून आहे, असे मत सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी शनिवारी व्यक्त केले.१० व्या कायदा शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका पुरस्कार सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोसायटी आॅफ इंडियन लॉ फर्म्स (एसआयएलएफ) आणि मेनन इन्स्टिट्यूट आॅफ लीगल अ‍ॅडव्होकसी ट्रेनिंग (एमआयएलएटी) यांनी ‘राष्ट्र उभारणीत कायदा शिक्षणाची भूमिका’ या विषयावर परिसंवाद भरविला होता. या परिसंवादात मिस्रा म्हणाले की, कायद्याचे शिक्षण देणाºया संस्थाच देशाला लागणारे कायदेविषयक व्यावसायिक घडवत असतात. देशात कायद्याचे राज्य आणत असताना या व्यावसायिकांची भूमिका एखाद्या पहारेकºयाप्रमाणे असते. कायदा शिक्षणातून मुलांना आपल्या एकूण सामाजिक रचनेचे भान येते, त्यांच्यात एक परिपक्वता येते. त्यामुळेच ते नागरिकांच्या हक्कांचे नीटपणे रक्षण करू शकतात.यावेळी मिस्रा यांनी कायदा शिक्षण देणाºया संस्थांचे कौतुक केले. ते म्हणाले की, देशातील कायदा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात या संस्थांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. कायदा शिक्षणाचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरु करणे भारतासाठी खूप गरजेचे होते. हे शिक्षण घेणाºया मुलांनी देशातील तसेच जागतिक पातळीवरील घडामोडींवर सतत नजर ठेवली पाहिजे. या संस्थांनी मुलांमध्ये कायद्यात अंतर्र्भूत केलेल्या सामाजिक, तात्विक आणि राजकीय बाबींकडे चिकित्सक नजरेने पाहण्याची क्षमता विकसित केली पाहिजे.अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा एसआयएलएफ-एमआयएलएटी प्रा. एन. आर. माधव मेनन बेस्ट लॉ टीचर पुरस्कार यावेळी बंगळुरुच्या नॅशनल लॉ स्कूल आॅफ इंडिया युनिव्हर्सिटीच्या प्रा. आर. व्यंकटा राव यांना प्रदान करण्यात आला. (वृत्तसंस्था)कायदा शिक्षणसंस्थांची भूमिका महत्त्वाचीदीपक मिस्रा म्हणाले की, कायदा शिक्षणाचा दर्जा वाढविताना शिक्षण संस्थांचे असलेले महत्त्व सतत लक्षात ठेवले पाहिजे. प्रा. एन. आर. माधव मेनन यांनी कायदा शिक्षण संस्थांच्या जडणघडणीत भरीव योगदान दिले आहे.प्रा. मेनन म्हणाले की, देशात कायदा शिक्षण देणाºया संस्थांकडे कायमच दुर्लक्ष होत आले आहे. भारतात आज जरी राष्ट्रीय स्तरावरील २३ कायदा विद्यापीठे असली, तरी भारताला या शिक्षणात बरीच मोठी मजल गाठायची आहे.

टॅग्स :Deepak Mishraदीपक मिश्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालय