शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

भारतात दहा लाख लोकांमागे फक्त ९जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 00:06 IST

अन्य देशांच्या तुलनेत अत्यल्प प्रमाण; मृत्यूदर कमी राखण्यातही यश

नवी दिल्ली : जगातील अमेरिकेसह अनेक देशांत कोरोनाने माजविलेल्या हाहाकाराच्या तुलनेत भारतातील स्थिती खूपच बरी आहे. भारतामध्ये दर १० लाख लोकांमागे फक्त नऊ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून, हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत सर्वात अत्यल्प आहे. दर १० लाख लोकांमागे स्पेनमध्ये ३,८६४ जणांना, इटलीमध्ये २,७३२ तर फ्रान्समध्ये २,२६५ व अमेरिकेत १,९४६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग व त्यामुळे होणारे मृत्यू यांचे प्रमाण कमी राखण्यात भारताला यश आले आहे. दर १० लाख लोकांमागे भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ०.३ इतके व जगात अशा प्रकारच्या आकडेवारीत सर्वात कमी आहे. कोरोनामुळे दर दहा लाख लोकांमागे स्पेनमध्ये ४०२, इटलीमध्ये ३५८, फ्रान्समध्ये २६३ लोक मरण पावले आहेत. भारतामध्ये कोरोनाच्या रुग्णांनी दहा हजारचा आकडा ओलांडला त्यावेळेस देशभरात २,१७,५५४ जणांची या साथीसंदर्भातील वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली होती. कॅनडामध्ये आतापर्यंत२,९५,०६५ लोकांची कोरोनाविषयक चाचणी करण्यात आली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यासह काही देशांमध्ये गेल्या दोन तीन दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये ७५ ते ३०००पर्यंत वाढ झाली आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या इतक्या प्रमाणात वाढण्यास भारतात मात्र ४ दिवस लागले. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ६ हजारवरून १२ हजारपर्यंत वाढण्यास सहा दिवस लागले.देशातील बळींमध्ये बहुतांश ५९ वर्षे वयावरीलभारतामध्ये आतापर्यंत ४००पेक्षा अधिक बळी गेले असून त्यातील बहुतांश लोकांचे वय ५९ वर्षांपेक्षा जास्त आहे. मृतांपैकी अनेकजणमधुमेह, हृदय, मूत्रपिंडाचे आजार, उच्च रक्तदाब अशा आजारांनी पूर्वीपासून ग्रस्त होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतprime ministerपंतप्रधान