शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भारतात दहा लाख लोकांमागे फक्त ९जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 00:06 IST

अन्य देशांच्या तुलनेत अत्यल्प प्रमाण; मृत्यूदर कमी राखण्यातही यश

नवी दिल्ली : जगातील अमेरिकेसह अनेक देशांत कोरोनाने माजविलेल्या हाहाकाराच्या तुलनेत भारतातील स्थिती खूपच बरी आहे. भारतामध्ये दर १० लाख लोकांमागे फक्त नऊ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून, हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत सर्वात अत्यल्प आहे. दर १० लाख लोकांमागे स्पेनमध्ये ३,८६४ जणांना, इटलीमध्ये २,७३२ तर फ्रान्समध्ये २,२६५ व अमेरिकेत १,९४६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग व त्यामुळे होणारे मृत्यू यांचे प्रमाण कमी राखण्यात भारताला यश आले आहे. दर १० लाख लोकांमागे भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ०.३ इतके व जगात अशा प्रकारच्या आकडेवारीत सर्वात कमी आहे. कोरोनामुळे दर दहा लाख लोकांमागे स्पेनमध्ये ४०२, इटलीमध्ये ३५८, फ्रान्समध्ये २६३ लोक मरण पावले आहेत. भारतामध्ये कोरोनाच्या रुग्णांनी दहा हजारचा आकडा ओलांडला त्यावेळेस देशभरात २,१७,५५४ जणांची या साथीसंदर्भातील वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली होती. कॅनडामध्ये आतापर्यंत२,९५,०६५ लोकांची कोरोनाविषयक चाचणी करण्यात आली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यासह काही देशांमध्ये गेल्या दोन तीन दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये ७५ ते ३०००पर्यंत वाढ झाली आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या इतक्या प्रमाणात वाढण्यास भारतात मात्र ४ दिवस लागले. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ६ हजारवरून १२ हजारपर्यंत वाढण्यास सहा दिवस लागले.देशातील बळींमध्ये बहुतांश ५९ वर्षे वयावरीलभारतामध्ये आतापर्यंत ४००पेक्षा अधिक बळी गेले असून त्यातील बहुतांश लोकांचे वय ५९ वर्षांपेक्षा जास्त आहे. मृतांपैकी अनेकजणमधुमेह, हृदय, मूत्रपिंडाचे आजार, उच्च रक्तदाब अशा आजारांनी पूर्वीपासून ग्रस्त होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतprime ministerपंतप्रधान