शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कांदा निर्यात संपूर्ण बंद; व्यापारी साठ्यांवरही निर्बंधाचा केंद्राचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 07:05 IST

गेल्या सहा महिन्यांत देशभरात सतत वाढत असलेल्या कांद्याच्या किंमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी सर्व श्रेणीच्या कांद्याच्या निर्यातीवर संपूर्ण बंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.

नवी दिल्ली: गेल्या सहा महिन्यांत देशभरात सतत वाढत असलेल्या कांद्याच्या किंमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी सर्व श्रेणीच्या कांद्याच्या निर्यातीवर संपूर्ण बंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचसोबत उपलब्ध कांद्याची साठेबाजी करून व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची पिळवणूक होऊ नये यासाठी सरकारने कांद्याच्या साठयांवरही निर्बंध लागू केले.यासाठी व्यापार आणि उद्योग तसेच ग्राहक संरक्षण या केंद्र सरकारच्या दोन मंत्रालयांनी समन्वित पावले उचलली. एकीकडे व्यापार मंत्रालयाने प्रचलित निर्यात धोरणात सुधारणा करणारी अधिसूचना केली तर ग्राहक संरक्षण मंत्रालयाने जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कांद्याच्या साठेबाजीवर निर्बंध आणले. याआधी कांद्याचा समावेश मुक्त निर्यात करता येईल, अशा वस्तूंमध्ये होता. आता कांद्याचा समावेश निर्यातबंदी असलेल्या वस्तूंमध्ये टाकण्यात आला आहे.ही निर्यातबंदी तात्काळ प्रभावाने लागू झाली असून ती पुढील सुधारित आदेश होईपर्यंत लागू राहील. खरे तर साठवणूक मर्यादा ठरविणे व तिची अंमलबजावणी करणे हे राज्य सरकारांचे काम असते. परंतु देशभर समान कारवाई व्हावी यासाठी यावेळी केंद्राने स्वत:च कायद्याच्या साठवणुकीची मर्यादा ठरविली. त्यानुसार किरकोळ व्यापाऱ्यांना १०० क्ंिवटल व घाऊक व्यापाºयांना ५०० क्विंटल अशी कमाल मर्यादा घालण्यात आली आहे. राज्य सरकारांनी वेळ पडल्यास धाडी घालून याची कठोर अंमलबजावणी करावी, असे त्यांना सांगण्यात आले आहे.मान्सूनच्या उत्तरार्धातील अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. नवा कांदा आॅक्टोबरअखेर बाजारात येईपर्यंत आधीच्या हंगामातील साठवलेल्या कांदा मागणी भागविण्यास अपुरा असल्याने बाजारात टंचाई निर्माण झली. परिणामीे कांद्याच्या घाऊक व किरकोळ किंमती वाढत गेल्या. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यांत कांद्याचे किरकोळ भाव किलोमागे २० ते २५ रुपयांनी वाढले आहेत. मुंबई-पुण्यात किरकोळ ग्राहकांना ६० ते ७० रुपये किलो दराने कांदा घ्यावा लागत आहे.किंमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने याआधी राखीव साठ्यातील ५० हजार टन कांदा उपलब्ध केला. यातून राज्यांनी त्यांच्या गरजेनुसार कांदा घ्यावा, असे ग्राहकसंरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले होते. त्यानंतर सरकारने निर्यातीमुळे देशात टंचाई होऊ नये यासाठी टनाला ८५० डॉलरहून कमी दराने कांदा निर्यात करण्यास मनाई करेली. तरीही किंमती खाली येण्याची चिन्हे न दिसल्याने आता संपबर्ण निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.निवडणुकांवर डोळाकांद्याचे भाव कोसळणे किंवा कमालीचे चढणे या दोन्हीगोष्टी सत्ताधाºयांसाठी संवेदनशील आहेत. पूर्र्वी कांद्याचे दर आकाशाला भिडल्याने दिल्लीच्या निवडणुकीत सत्ताधाºयांनासत्ता गमवावी लागली होती. आताही महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यांत विधानसभा निवडणुका असल्याने कांद्यावरून मतदारांमध्ये नाराजी सत्ताधाºयांना परवडणारी नाही. 

टॅग्स :onionकांदाCentral Governmentकेंद्र सरकार