शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कांदा विकणारा बनला 100 कोटींचा मालक; 'असा' अडकवायचा जाळ्यात, अखेर झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 15:22 IST

10 वर्षांपूर्वी बाजारात कांद्याचे कमिशन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, पण नंतर असं काही घडलं की, कांद्याचे तुटपुंजे कमिशन घेणारा हा कोट्यवधींचा मालक बनला.

उत्तर प्रदेशमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे, बुलंदशहर जिल्ह्यात 10 वर्षांपूर्वी बाजारातील कांदे विकणारा दलाल 100 कोटींहून अधिक रुपयांचा मालक बनला. 10 वर्षांपूर्वी तो बाजारात कांद्याचे कमिशन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, पण नंतर असं काही घडलं की, कांद्याचे तुटपुंजे कमिशन घेणारा हा कोट्यवधींचा मालक बनला. त्याने 10 वर्षांत 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता बेकायदेशीरपणे मिळवली. 

पैसे मिळवताना सुधीर गोयल याने शेतकऱ्यांची, अनेक लोकांची फसवणूकही केली. यासोबतच त्याने सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही आपल्या जाळ्यात अडकवलं. चांगल्या ठिकाणी प्लॉट व घरं दाखवून लोकांची फसवणूक केली. एका व्यक्तीला फसवणुकीचा हा प्रकार कळताच त्याने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली, तेव्हाच सत्य समोर आलं.

पोलिसांनी सुधीर गोयलविरोधात अनेक अधिक गुन्हे दाखल केले आहेत, तर 100 हून अधिक प्रकरणांचा तपास सुरू आहे. 10 वर्षांपूर्वी बाजारात कांद्यामध्ये एजंट म्हणून काम करणारा अवघ्या 10 वर्षांत 100 कोटींहून अधिक मालमत्तेचा मालक बनला. फसवणूक झालेले काही लोक अजूनही पोलिसांकडे तक्रार करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी अनुकृती शर्मा यांनी 16 डिसेंबर रोजी या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीसह 5 जणांना अटक करून जेलमध्ये पाठवलं. सध्या हा सुधीर गोयल, पत्नी राखी गोयल आणि अन्य तीन साथीदार तुरुंगात आहेत, तर ईडी याप्रकरणी सुधीर आणि त्याच्या साथीदारांविरोधातही चौकशी करत असून आतापर्यंत ईडीने बुलंदशहरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. 

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारी