शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

जमिनीत धसलेला ट्रक अन् बोरिंग मशीन बाहेर काढल्यास काय होईल?; सगळेच गावकरी दहशतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:50 IST

या पाण्याच्या दबावामुळे जमीन धसली आणि त्यात ट्रक आणि बोरिंग मशीनही बुडाली. २ दिवसाने अचानक पाण्याचा वेग कमी झाला. 

जैसलमेर - राजस्थानच्या जैसलमेर इथं मोहनगड परिसरात घडलेल्या घटनेने सगळेच गावकरी दहशतीत आहेत. याठिकाणी ट्यूबवेल बोरिंगवेळी ट्रक आणि मशीन जमिनीत धसला. त्यानंतर भूगर्भातील प्रचंड दबावाने पाणी आणि गॅस बाहेर निघू लागला. पाण्याचा वेग पाहता आसपासच्या परिसरात काही क्षणात तळं साचलं. या घटनेनंतर ONGC च्या तांत्रिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली आणि तिथला आढावा घेतला आहे.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर या पथकाने गावकऱ्यांशी संवाद साधला. जर हा ट्रक आणि बोरिंग मशीन बाहेर काढली तर अधिक धोका निर्माण होऊ शकतो. ट्रक आणि मशीन बाहेर काढणे खूप कठीण आहे जर हे केले तर याठिकाणी पुन्हा पाण्याच्या दाबाने जमीन खचण्याची शक्यता आहे. ट्रक आणि मशीन यांच्यामुळे पाण्याचा दबाव कमी झाला आहे. जर ते हटवले तर पाणी आणखी वेगात येऊ शकते. जमिनीत धसलेला हा ट्रक आणि मशीन काढायची की नाही याबाबत ओएनजीसी टीम रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना सोपवणार आहे.

ज्याठिकाणी ही घटना घडली आहे तिथे पाण्यासह गॅसचे बुडबुडे बाहेर निघत आहेत. जमिनीत धसलेला ट्रक आणि मशीन बाहेर काढण्यासाठी खर्च येईल पण त्याशिवाय अधिक इथली परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती ONGC च्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ज्या जागेवर बोरिंग केली जात होती तिथून पाण्याचा फवारा बाहेर पडत आहे ते पाणी ६० लाख वर्ष जुने असू शकते. जमिनीतून निघणारे पाणी आणि खारे पाणी यातून काही तज्ज्ञ हे पाणी समुद्राचं असू शकते असा दावा करत आहेत. 

नेमकं काय घडलं?

२७ डिसेंबर रोजी जैसलमेरच्या मोहनगड परिसरात बोअरवेलच्या खोदकामावेळी अचानक जमिनीतून पाण्याचा फवारा बाहेर पडला. या पाण्याच्या दबावामुळे जमीन धसली आणि त्यात ट्रक आणि बोरिंग मशीनही बुडाली. २ दिवसाने अचानक पाण्याचा वेग कमी झाला. परंतु पाण्याचा वेग पुन्हा वाढण्याचीही भीती तज्ज्ञ व्यक्त करतायेत. सध्या या परिसरात प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून ५०० मीटर परिसर रिकामा केला आहे. याठिकाणी भेट देण्यासाठी आलेले भूजल तज्ज्ञ डॉ. नारायणदास इण्खिया यांनी पाण्याचा दबाव समुद्राच्या लाटांसारखा आहे ज्यामुळे सगळीकडे पाणी पसरत असल्याचं सांगितले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान