शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

जमिनीत धसलेला ट्रक अन् बोरिंग मशीन बाहेर काढल्यास काय होईल?; सगळेच गावकरी दहशतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:50 IST

या पाण्याच्या दबावामुळे जमीन धसली आणि त्यात ट्रक आणि बोरिंग मशीनही बुडाली. २ दिवसाने अचानक पाण्याचा वेग कमी झाला. 

जैसलमेर - राजस्थानच्या जैसलमेर इथं मोहनगड परिसरात घडलेल्या घटनेने सगळेच गावकरी दहशतीत आहेत. याठिकाणी ट्यूबवेल बोरिंगवेळी ट्रक आणि मशीन जमिनीत धसला. त्यानंतर भूगर्भातील प्रचंड दबावाने पाणी आणि गॅस बाहेर निघू लागला. पाण्याचा वेग पाहता आसपासच्या परिसरात काही क्षणात तळं साचलं. या घटनेनंतर ONGC च्या तांत्रिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली आणि तिथला आढावा घेतला आहे.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर या पथकाने गावकऱ्यांशी संवाद साधला. जर हा ट्रक आणि बोरिंग मशीन बाहेर काढली तर अधिक धोका निर्माण होऊ शकतो. ट्रक आणि मशीन बाहेर काढणे खूप कठीण आहे जर हे केले तर याठिकाणी पुन्हा पाण्याच्या दाबाने जमीन खचण्याची शक्यता आहे. ट्रक आणि मशीन यांच्यामुळे पाण्याचा दबाव कमी झाला आहे. जर ते हटवले तर पाणी आणखी वेगात येऊ शकते. जमिनीत धसलेला हा ट्रक आणि मशीन काढायची की नाही याबाबत ओएनजीसी टीम रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना सोपवणार आहे.

ज्याठिकाणी ही घटना घडली आहे तिथे पाण्यासह गॅसचे बुडबुडे बाहेर निघत आहेत. जमिनीत धसलेला ट्रक आणि मशीन बाहेर काढण्यासाठी खर्च येईल पण त्याशिवाय अधिक इथली परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती ONGC च्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ज्या जागेवर बोरिंग केली जात होती तिथून पाण्याचा फवारा बाहेर पडत आहे ते पाणी ६० लाख वर्ष जुने असू शकते. जमिनीतून निघणारे पाणी आणि खारे पाणी यातून काही तज्ज्ञ हे पाणी समुद्राचं असू शकते असा दावा करत आहेत. 

नेमकं काय घडलं?

२७ डिसेंबर रोजी जैसलमेरच्या मोहनगड परिसरात बोअरवेलच्या खोदकामावेळी अचानक जमिनीतून पाण्याचा फवारा बाहेर पडला. या पाण्याच्या दबावामुळे जमीन धसली आणि त्यात ट्रक आणि बोरिंग मशीनही बुडाली. २ दिवसाने अचानक पाण्याचा वेग कमी झाला. परंतु पाण्याचा वेग पुन्हा वाढण्याचीही भीती तज्ज्ञ व्यक्त करतायेत. सध्या या परिसरात प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून ५०० मीटर परिसर रिकामा केला आहे. याठिकाणी भेट देण्यासाठी आलेले भूजल तज्ज्ञ डॉ. नारायणदास इण्खिया यांनी पाण्याचा दबाव समुद्राच्या लाटांसारखा आहे ज्यामुळे सगळीकडे पाणी पसरत असल्याचं सांगितले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान