शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण, दिल्ली पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 08:58 IST

शेतकरी आंदोलनाच्या वर्षपुर्तीनिमीत्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना परत घेण्यासह इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला आज(शुक्रवार) 1 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने दिल्लीच्या सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी जमा होत आहेत. आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनायटेड किसान मोर्चा (SKM) ने 'दिल्ली चलो' ची हाक दिली आहे, ज्या अंतर्गत दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी येतील. 

दिल्ली, सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही सीमांवर शेतकरी गेल्या वर्षभरापासून तळ ठोकून आहेत. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षी 26-27 नोव्हेंबर रोजी 'दिल्ली चलो' कार्यक्रमाने आंदोलनाला सुरुवात झाली होती. केंद्राने नुकतेच तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील शेतकरी जल्लोष करणार आहेत. युनायटेड किसान मोर्चाने दिलेल्या निवेदनानुसार, दिल्लीतील विविध निषेध स्थळांवर हजारो शेतकरी पोहोचू लागले आहेत. दिल्लीपासून दूर असलेल्या राज्यांमध्ये या निमित्ताने रॅली, धरणे आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू आहे.

सीमेवर शेतकरी येणे सुरू

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, राजधानीच्या विविध सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, सर्व सीमांसोबतच सिंघू सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना कडक शब्दात कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही आणि जो कोणी कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

दिल्ली पोलिस कर्मचार्‍यांसह निमलष्करी दल तैनात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून आंदोलनकर्ते शेतकरी ज्या ठिकाणी धरणे धरत आहेत त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दल तैनात करण्यात येणार आहे. विशेष पोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था विभाग झोन-1) दीपेंद्र पाठक म्हणाले, पुरेशी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे आणि वरिष्ठ पोलिस अधिकारीही बारकाईने लक्ष ठेवत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही व्यावसायिक पोलिसिंगचा वापर करत आहोत. यासंदर्भात गुरुवारी शेतकरी नेत्यांची बैठक घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीrakesh tikaitराकेश टिकैत