शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण, दिल्ली पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 08:58 IST

शेतकरी आंदोलनाच्या वर्षपुर्तीनिमीत्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना परत घेण्यासह इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला आज(शुक्रवार) 1 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने दिल्लीच्या सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी जमा होत आहेत. आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनायटेड किसान मोर्चा (SKM) ने 'दिल्ली चलो' ची हाक दिली आहे, ज्या अंतर्गत दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी येतील. 

दिल्ली, सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही सीमांवर शेतकरी गेल्या वर्षभरापासून तळ ठोकून आहेत. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षी 26-27 नोव्हेंबर रोजी 'दिल्ली चलो' कार्यक्रमाने आंदोलनाला सुरुवात झाली होती. केंद्राने नुकतेच तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील शेतकरी जल्लोष करणार आहेत. युनायटेड किसान मोर्चाने दिलेल्या निवेदनानुसार, दिल्लीतील विविध निषेध स्थळांवर हजारो शेतकरी पोहोचू लागले आहेत. दिल्लीपासून दूर असलेल्या राज्यांमध्ये या निमित्ताने रॅली, धरणे आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू आहे.

सीमेवर शेतकरी येणे सुरू

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, राजधानीच्या विविध सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, सर्व सीमांसोबतच सिंघू सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना कडक शब्दात कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही आणि जो कोणी कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

दिल्ली पोलिस कर्मचार्‍यांसह निमलष्करी दल तैनात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून आंदोलनकर्ते शेतकरी ज्या ठिकाणी धरणे धरत आहेत त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दल तैनात करण्यात येणार आहे. विशेष पोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था विभाग झोन-1) दीपेंद्र पाठक म्हणाले, पुरेशी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे आणि वरिष्ठ पोलिस अधिकारीही बारकाईने लक्ष ठेवत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही व्यावसायिक पोलिसिंगचा वापर करत आहोत. यासंदर्भात गुरुवारी शेतकरी नेत्यांची बैठक घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीrakesh tikaitराकेश टिकैत