शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण, दिल्ली पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 08:58 IST

शेतकरी आंदोलनाच्या वर्षपुर्तीनिमीत्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना परत घेण्यासह इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला आज(शुक्रवार) 1 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने दिल्लीच्या सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी जमा होत आहेत. आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनायटेड किसान मोर्चा (SKM) ने 'दिल्ली चलो' ची हाक दिली आहे, ज्या अंतर्गत दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी येतील. 

दिल्ली, सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही सीमांवर शेतकरी गेल्या वर्षभरापासून तळ ठोकून आहेत. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षी 26-27 नोव्हेंबर रोजी 'दिल्ली चलो' कार्यक्रमाने आंदोलनाला सुरुवात झाली होती. केंद्राने नुकतेच तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील शेतकरी जल्लोष करणार आहेत. युनायटेड किसान मोर्चाने दिलेल्या निवेदनानुसार, दिल्लीतील विविध निषेध स्थळांवर हजारो शेतकरी पोहोचू लागले आहेत. दिल्लीपासून दूर असलेल्या राज्यांमध्ये या निमित्ताने रॅली, धरणे आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू आहे.

सीमेवर शेतकरी येणे सुरू

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, राजधानीच्या विविध सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, सर्व सीमांसोबतच सिंघू सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना कडक शब्दात कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही आणि जो कोणी कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

दिल्ली पोलिस कर्मचार्‍यांसह निमलष्करी दल तैनात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून आंदोलनकर्ते शेतकरी ज्या ठिकाणी धरणे धरत आहेत त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दल तैनात करण्यात येणार आहे. विशेष पोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था विभाग झोन-1) दीपेंद्र पाठक म्हणाले, पुरेशी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे आणि वरिष्ठ पोलिस अधिकारीही बारकाईने लक्ष ठेवत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही व्यावसायिक पोलिसिंगचा वापर करत आहोत. यासंदर्भात गुरुवारी शेतकरी नेत्यांची बैठक घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीrakesh tikaitराकेश टिकैत