शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता लाखो लोकांना मिळणार थेट फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 16:54 IST

विधेयक मंजूर झाल्यास रेल्वेची क्षमता वाढेल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

नवी दिल्ली : रेल्वेच्या जनरल डब्यातून किंवा बोगीतून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने तयारी केली आहे. दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत 1905 च्या भारतीय रेल्वे बोर्ड कायद्याला 1989 च्या रेल्वे कायद्याशी एकीकृत करण्याच्या तरतुदीसह एक विधेयक सादर केले. तसेच, हे विधेयक मंजूर झाल्यास रेल्वेची क्षमता वाढेल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

अश्विनी वैष्णव यांनी 'रेल्वे दुरुस्ती विधेयक 2024' चर्चेसाठी आणि पारित करण्यासाठी सभागृहात मांडले. ते म्हणाले की,  सुरुवातीला रेल्वे सार्वजनिक बांधकाम विभागचा एक भाग होता आणि 1905 मध्ये ते सार्वजनिक बांधकाम विभागापासून वेगळे करण्यात आले आणि नवीन रेल्वे बोर्ड स्थापन करण्यात आले. 1989 मध्ये नवीन रेल्वे कायदा कायदा करण्यात आला होता, परंतु 1905 च्या रेल्वे बोर्ड कायद्याचा त्यात समावेश करण्यात आलेला नाही, जो त्याच वेळी व्हायला हवा होता.

सध्या सादर करण्यात आलेले हे विधेयक फक्त भारतीय रेल्वे बोर्ड कायदा 1905 ला रेल्वे कायदा 1989 मध्ये एकीकृत करण्यासाठी आणले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास रेल्वेची क्षमता आणि विकास वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रेल्वेने गेल्या 10 वर्षांत खूप विकास केला आहे. तसेच, गरीब प्रवाशांसाठी या महिन्याच्या अखेरीस रेल्वे गाड्यांमध्ये एक हजार सामान्य डबे जोडले जातील. तर एकूण 10 हजार नवीन डबे जोडण्याचा उपक्रम आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

याचबरोबर, मोदी सरकारच्या काळात रेल्वेचे बजेट वाढले आहे. रेल्वेचे विद्युतीकरण वाढले आहे आणि त्याचे नेटवर्कही वेगाने विस्तारत आहे. तसेच, मोदी सरकारने रेल्वेच्या सुरक्षेकडेही लक्ष दिले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे यूपीए सरकारच्या काळात एका वर्षात सरासरी 153 रेल्वे अपघात होत होते, तर गेल्या वर्षी 40 रेल्वे अपघात समोर आले आणि या वर्षी आतापर्यंत 29 रेल्वे अपघातांची नोंद झाली आहे. रेल्वे अपघात आणखी कमी करण्याकडे लक्ष दिले जात आहेत, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितली.

टॅग्स :railwayरेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव