शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता लाखो लोकांना मिळणार थेट फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 16:54 IST

विधेयक मंजूर झाल्यास रेल्वेची क्षमता वाढेल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

नवी दिल्ली : रेल्वेच्या जनरल डब्यातून किंवा बोगीतून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने तयारी केली आहे. दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत 1905 च्या भारतीय रेल्वे बोर्ड कायद्याला 1989 च्या रेल्वे कायद्याशी एकीकृत करण्याच्या तरतुदीसह एक विधेयक सादर केले. तसेच, हे विधेयक मंजूर झाल्यास रेल्वेची क्षमता वाढेल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

अश्विनी वैष्णव यांनी 'रेल्वे दुरुस्ती विधेयक 2024' चर्चेसाठी आणि पारित करण्यासाठी सभागृहात मांडले. ते म्हणाले की,  सुरुवातीला रेल्वे सार्वजनिक बांधकाम विभागचा एक भाग होता आणि 1905 मध्ये ते सार्वजनिक बांधकाम विभागापासून वेगळे करण्यात आले आणि नवीन रेल्वे बोर्ड स्थापन करण्यात आले. 1989 मध्ये नवीन रेल्वे कायदा कायदा करण्यात आला होता, परंतु 1905 च्या रेल्वे बोर्ड कायद्याचा त्यात समावेश करण्यात आलेला नाही, जो त्याच वेळी व्हायला हवा होता.

सध्या सादर करण्यात आलेले हे विधेयक फक्त भारतीय रेल्वे बोर्ड कायदा 1905 ला रेल्वे कायदा 1989 मध्ये एकीकृत करण्यासाठी आणले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास रेल्वेची क्षमता आणि विकास वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रेल्वेने गेल्या 10 वर्षांत खूप विकास केला आहे. तसेच, गरीब प्रवाशांसाठी या महिन्याच्या अखेरीस रेल्वे गाड्यांमध्ये एक हजार सामान्य डबे जोडले जातील. तर एकूण 10 हजार नवीन डबे जोडण्याचा उपक्रम आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

याचबरोबर, मोदी सरकारच्या काळात रेल्वेचे बजेट वाढले आहे. रेल्वेचे विद्युतीकरण वाढले आहे आणि त्याचे नेटवर्कही वेगाने विस्तारत आहे. तसेच, मोदी सरकारने रेल्वेच्या सुरक्षेकडेही लक्ष दिले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे यूपीए सरकारच्या काळात एका वर्षात सरासरी 153 रेल्वे अपघात होत होते, तर गेल्या वर्षी 40 रेल्वे अपघात समोर आले आणि या वर्षी आतापर्यंत 29 रेल्वे अपघातांची नोंद झाली आहे. रेल्वे अपघात आणखी कमी करण्याकडे लक्ष दिले जात आहेत, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितली.

टॅग्स :railwayरेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव