शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

18 वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत नाव येणार; सरकार विधेयक आणणार, अमित शहा म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 18:35 IST

केंद्र सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यानुसार, वयाची 18 वर्षे पूर्ण होताच व्यक्तीचे नाव आपोआप मतदार यादीत येईल.

18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव टाकरण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. पण, जर तुमचे नाव मतदार यादीत आपोआप आले तर? हे सध्या शक्य नाही, परंतु लवकरच होऊ शकते. केंद्र सरकार असे विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, ज्यात वयाची 18 वर्षे पूर्ण होताच आपोआप मतदार यादीत नाव टाकले जाईल. एवढंच नाही तर एखाद्याचा मृत्यू झाल्यास, त्याचे नाव मतदार यादीतून आपोआप काढून टाकले जाईल.

विधेयकात काय असेल ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जनगणना इमारतीचे उद्घाटन करताना ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सरकार संसदेत एक विधेयक आणणार आहे, ज्यामध्ये जन्म आणि मृत्यू नोंदणी मतदार यादीशी जोडण्याची तरतूद असेल. अमित शाह म्हणाले, 'मतदार यादीशी मृत्यू आणि जन्म नोंदणी जोडण्यासाठी विधेयक आणले जाईल. या अंतर्गत एखादी व्यक्ती 18 वर्षांची झाल्यावर त्याचे नाव आपोआप मतदार यादीत जोडले होईल. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचे नाव मतदार यादीतून काढून टाकले जाईल.'

लायसन्स-पासपोर्ट मिळणेही सोपे होणार जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा, 1969 मध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक आणले जाईल. हे विधेयक आल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट देण्यापासून इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यापर्यंत अनेक गोष्टी अतिशय सोयीस्कर होतील. जन्म-मृत्यूचे दाखले नीट जतन केले, तर जनगणनेच्या मध्यावरच सर्वांगीण विकासाचे नियोजन करणे सोपे जाईल.

हे सगळं कसं होणार?गेल्या वर्षी अमित शहा म्हणाले होते की, पुढील जनगणना पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असेल. ती 100% अचूक असेल आणि पुढील 25 वर्षांसाठी विकास आराखडा तयार केला जाईल. ई-जनगणनेसाठी एक सॉफ्टवेअर तयार केले जाईल. मोबाईल अॅप्लिकेशनही तयार होईल. याच्या मदतीने लोक घरी बसून त्यांचा डेटा अपडेट करू शकतील. जन्मापासून मृत्यूपर्यंतची तारीख जनगणनेशी जोडली जाईल. मुलाच्या जन्मासोबतच त्याची तारीखही जनगणना कार्यालयात नोंदवली जाईल. तो 18 वर्षांचा झाल्यावर त्याचे नाव आपोआप मतदार यादीत समाविष्ट होईल आणि त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा डेटा आपोआप हटवला जाईल.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकार