शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

“कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्मीरचे उर्वरित देशाशी असलेले संबंध बिघडले”: ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 18:08 IST

Omar Abdullah: जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होतील तेव्हा लोक या निर्णयावरील नाराजी दाखवतील, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Omar Abdullah: जम्मू काश्मीमधून अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे या प्रदेशाचे उर्वरित संपूर्ण देशाशी असलेले संबंध खराब झाले. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयावर कुणीही आनंदी नव्हते. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, जम्मू-काश्मीरला दिलेली आश्वासने ही दिल्लीत बसलेल्या नेत्याने किंवा पक्षाने दिलेली आश्वासने नव्हती, तर ती देशाने जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिलेली आश्वासने होती. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधील कोणा एका व्यक्तीमधील हा बंध नव्हता. तर तो या राज्याचा उर्वरित देशाशी असलेला दुवा होता. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होतील तेव्हा लोक या निर्णयांवर नाराजी दाखवतील, असे सूचक विधान ओमर अब्दुल्ला यांनी केले. 

अलीकडील निवडणुकांमध्ये ही नाराजी सिद्ध झाली आहे

अशा प्रकारचा निर्णय योग्य होता, असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी एकमेकांचे अभिनंदन करावे. परंतु, ही गोष्ट सत्य आहे की, ०५ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात आलेला निर्णय योग्य नव्हता. येथील जनता या निर्णयावर खूश नव्हती. अलीकडे झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये ही नाराजी सिद्ध झाली. विधानसभा निवडणुका घेतल्या तर पुन्हा हीच गोष्ट सिद्ध होईल, असा दावा ओमर अब्दुल्ला यांनी केला. 

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या नाहीत. यावर बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, येथील स्थानिक जनतेचा मतदानाचा हक्क डावलला जात आहे. मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवले जात आहे. तसेच येथील जनतेला त्यांचा लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. विधानसभा निवडणुकांबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा करतो, तेव्हा निवडणूक आयोग केंद्राकडे बोट दाखवते आणि केंद्र सरकारला याबाबत प्रश्न विचारतो, तेव्हा निवडणूक आयोगाच्या कोर्टात हा चेंडू टाकला जातो, अशी टीका ओमर अब्दुल्ला यांनी केली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरOmar Abdullahउमर अब्दुल्लाArticle 370कलम 370