शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कलम ३७० हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून वैध; उमर अब्दुलांनी फुंकलं रणशिंग, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 15:05 IST

कोर्टाच्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सु्प्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयाबद्दल जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

जम्मू काश्मिरातील कलम ३७० बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे की, "आमचा अपेक्षाभंग झाला असला तरी आम्ही निराश झालेलो नाहीत. संघर्ष यापुढेही सुरूच राहील. इथपर्यंत पोहोचायला भाजपला अनेक दशकं लागली आहेत. आम्हीही आता दीर्घकालीन लढाईची तयारी केली आहे," असं रणशिंग अब्दुल्ला यांनी फुंकलं आहे.

गुलाम नबी आझाद काय म्हणाले?

डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. कलम ३७० हटवणं ही एक चूक होती. जम्मू काश्मीरमधील राजकीय पक्षांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.

दरम्यान, कलम ३७० वर निकाल देताना सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड म्हणाले की, "जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत द्यायला हवा. निवडणूक आयोगाने नवीन सीमारचनेच्या आधारे विधानसभा निवडणुका घ्याव्यात. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत याठिकाणी विधानसभा निवडणूक घ्यावी. जितकं शक्य असेल तितक्या लवकर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा दिला," असं कोर्टाने म्हटलं आहे. 

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय