शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

कलम ३७० हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून वैध; उमर अब्दुलांनी फुंकलं रणशिंग, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 15:05 IST

कोर्टाच्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सु्प्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयाबद्दल जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

जम्मू काश्मिरातील कलम ३७० बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे की, "आमचा अपेक्षाभंग झाला असला तरी आम्ही निराश झालेलो नाहीत. संघर्ष यापुढेही सुरूच राहील. इथपर्यंत पोहोचायला भाजपला अनेक दशकं लागली आहेत. आम्हीही आता दीर्घकालीन लढाईची तयारी केली आहे," असं रणशिंग अब्दुल्ला यांनी फुंकलं आहे.

गुलाम नबी आझाद काय म्हणाले?

डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. कलम ३७० हटवणं ही एक चूक होती. जम्मू काश्मीरमधील राजकीय पक्षांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.

दरम्यान, कलम ३७० वर निकाल देताना सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड म्हणाले की, "जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत द्यायला हवा. निवडणूक आयोगाने नवीन सीमारचनेच्या आधारे विधानसभा निवडणुका घ्याव्यात. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत याठिकाणी विधानसभा निवडणूक घ्यावी. जितकं शक्य असेल तितक्या लवकर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा दिला," असं कोर्टाने म्हटलं आहे. 

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय