शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनण्याची शक्यता; NDA अन् INDIA आघाडीत एकमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 11:32 IST

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत झाल्याचं पुढे येत आहे. मात्र अद्याप त्यावर अधिकृत घोषणा नाही. 

नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्षपदी अखेर ओम बिर्ला यांच्या नावावर सहमती बनली आहे. ओम बिर्ला हे पुन्हा एकदा लोकसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहेत. सत्ताधारी पक्षाकडून राजनाथ सिंह यांनी मोर्चा सांभाळला. त्यात विरोधकांशी चर्चा करून उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लोकसभेची परंपरा कायम राहणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत सत्ताधारी आणि विरोधक यांनी एक एक पाऊल पुढे येत एकमत झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात लोकसभेचे अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिले जाण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं पुढे येत आहे. २०१४ आणि २०१९ या काळात भाजपानं स्वबळावर बहुमत मिळवलं होतं. विरोधकांच्या संख्याबळामुळे लोकसभेचे उपाध्यक्षपद मागील १० वर्ष रिक्त होते. १६ व्या आणि १७ व्या लोकसभेत कुठल्याही पक्षाकडे उपाध्यक्ष नव्हते. त्यामुळे सरकारवर कायम टीका होत राहिली. २०१४ ते २०१९ पर्यंत सुमित्रा महाजन, २०१९ ते २०२४ या काळात ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष होते. 

कोण आहेत ओम बिर्ला?

एनडीएकडून १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांचं नाव आघाडीवर आहे. ओम बिर्ला हे १७ व्या लोकसभेचेही अध्यक्ष होते. ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार प्रल्हाद गुंजन यांना ४१ हजार ९७४ मतांनी हरवले. आरएसएसचा गड मानला जाणाऱ्या कोटामधून ओम बिर्ला निवडून आले आहेत. ते सलग तिसऱ्यांदा कोटा मतदारसंघात जिंकले आहेत. 

राहुल गांधी काय म्हणाले?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी अध्यक्षपदासाठी विरोधकांनी पाठिंबा द्यावा असं मत व्यक्त केले. आम्ही अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ परंतु तुम्ही उपाध्यक्षपद विरोधकांना द्या असं राजनाथ सिंह यांना सांगण्यात आले. त्यावर मी पुन्हा फोन करतो असं राजनाथ सिंह म्हणाले. अद्याप कॉल आला नाही. पंतप्रधान मोदी सांगतात, सहकार्य करा, पण आमच्या नेत्यांचा अपमान केला जातोय. सरकारचा हेतू स्वच्छ नाही असा आरोप राहुल गांधींनी केला.  

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी