शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनण्याची शक्यता; NDA अन् INDIA आघाडीत एकमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 11:32 IST

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत झाल्याचं पुढे येत आहे. मात्र अद्याप त्यावर अधिकृत घोषणा नाही. 

नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्षपदी अखेर ओम बिर्ला यांच्या नावावर सहमती बनली आहे. ओम बिर्ला हे पुन्हा एकदा लोकसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहेत. सत्ताधारी पक्षाकडून राजनाथ सिंह यांनी मोर्चा सांभाळला. त्यात विरोधकांशी चर्चा करून उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लोकसभेची परंपरा कायम राहणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत सत्ताधारी आणि विरोधक यांनी एक एक पाऊल पुढे येत एकमत झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात लोकसभेचे अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिले जाण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं पुढे येत आहे. २०१४ आणि २०१९ या काळात भाजपानं स्वबळावर बहुमत मिळवलं होतं. विरोधकांच्या संख्याबळामुळे लोकसभेचे उपाध्यक्षपद मागील १० वर्ष रिक्त होते. १६ व्या आणि १७ व्या लोकसभेत कुठल्याही पक्षाकडे उपाध्यक्ष नव्हते. त्यामुळे सरकारवर कायम टीका होत राहिली. २०१४ ते २०१९ पर्यंत सुमित्रा महाजन, २०१९ ते २०२४ या काळात ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष होते. 

कोण आहेत ओम बिर्ला?

एनडीएकडून १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांचं नाव आघाडीवर आहे. ओम बिर्ला हे १७ व्या लोकसभेचेही अध्यक्ष होते. ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार प्रल्हाद गुंजन यांना ४१ हजार ९७४ मतांनी हरवले. आरएसएसचा गड मानला जाणाऱ्या कोटामधून ओम बिर्ला निवडून आले आहेत. ते सलग तिसऱ्यांदा कोटा मतदारसंघात जिंकले आहेत. 

राहुल गांधी काय म्हणाले?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी अध्यक्षपदासाठी विरोधकांनी पाठिंबा द्यावा असं मत व्यक्त केले. आम्ही अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ परंतु तुम्ही उपाध्यक्षपद विरोधकांना द्या असं राजनाथ सिंह यांना सांगण्यात आले. त्यावर मी पुन्हा फोन करतो असं राजनाथ सिंह म्हणाले. अद्याप कॉल आला नाही. पंतप्रधान मोदी सांगतात, सहकार्य करा, पण आमच्या नेत्यांचा अपमान केला जातोय. सरकारचा हेतू स्वच्छ नाही असा आरोप राहुल गांधींनी केला.  

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी