शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनण्याची शक्यता; NDA अन् INDIA आघाडीत एकमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 11:32 IST

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत झाल्याचं पुढे येत आहे. मात्र अद्याप त्यावर अधिकृत घोषणा नाही. 

नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्षपदी अखेर ओम बिर्ला यांच्या नावावर सहमती बनली आहे. ओम बिर्ला हे पुन्हा एकदा लोकसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहेत. सत्ताधारी पक्षाकडून राजनाथ सिंह यांनी मोर्चा सांभाळला. त्यात विरोधकांशी चर्चा करून उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लोकसभेची परंपरा कायम राहणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत सत्ताधारी आणि विरोधक यांनी एक एक पाऊल पुढे येत एकमत झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात लोकसभेचे अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिले जाण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं पुढे येत आहे. २०१४ आणि २०१९ या काळात भाजपानं स्वबळावर बहुमत मिळवलं होतं. विरोधकांच्या संख्याबळामुळे लोकसभेचे उपाध्यक्षपद मागील १० वर्ष रिक्त होते. १६ व्या आणि १७ व्या लोकसभेत कुठल्याही पक्षाकडे उपाध्यक्ष नव्हते. त्यामुळे सरकारवर कायम टीका होत राहिली. २०१४ ते २०१९ पर्यंत सुमित्रा महाजन, २०१९ ते २०२४ या काळात ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष होते. 

कोण आहेत ओम बिर्ला?

एनडीएकडून १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांचं नाव आघाडीवर आहे. ओम बिर्ला हे १७ व्या लोकसभेचेही अध्यक्ष होते. ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार प्रल्हाद गुंजन यांना ४१ हजार ९७४ मतांनी हरवले. आरएसएसचा गड मानला जाणाऱ्या कोटामधून ओम बिर्ला निवडून आले आहेत. ते सलग तिसऱ्यांदा कोटा मतदारसंघात जिंकले आहेत. 

राहुल गांधी काय म्हणाले?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी अध्यक्षपदासाठी विरोधकांनी पाठिंबा द्यावा असं मत व्यक्त केले. आम्ही अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ परंतु तुम्ही उपाध्यक्षपद विरोधकांना द्या असं राजनाथ सिंह यांना सांगण्यात आले. त्यावर मी पुन्हा फोन करतो असं राजनाथ सिंह म्हणाले. अद्याप कॉल आला नाही. पंतप्रधान मोदी सांगतात, सहकार्य करा, पण आमच्या नेत्यांचा अपमान केला जातोय. सरकारचा हेतू स्वच्छ नाही असा आरोप राहुल गांधींनी केला.  

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी