शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:36 IST

Farmer Protest: कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत.

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत. येत्या 6 जानेवारीला म्हणजे उद्या देशभर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहेत. (Farmer Protest continue for 70 days, on Saterday farmers called chakka jam in country.)

या पार्श्वभूमीवर आज आंदोलनस्थळी एक वेगळेच दृष्य दिसले. आंदोलनाच्या ठिकाणी एका वयोवृद्ध शेतकऱ्याला राकेश टिकैत यांनी त्यांच्या खांद्यावर मारले होते. टिकैत यांनी सांगितले की, वृद्ध शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातूनच आम्हाला समर्थन द्यावे. या आजोबांना आम्ही त्यांच्या गावी सोडलेले, मात्र ते पुन्हा आंदोलनात भाग घेण्यासाठी आले आहेत. उद्याचा चक्का जाम हा केवळ गावांमध्ये होणार आहे. दिल्लीमध्ये य़ाचा काहीच फरक दिसणार नाही. आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुर आहे. याद्वारे पुढे सरकारशी चर्चा केली जाईल. इथे गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलक बसले आहेत. चर्चा देखील झडत आहेत. इथे बसणारे सर्वच चुकीचे आहेत का, असा सवालही टिकैत यांनी विचारला आहे. 

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलेल्या आरोपांवर टिकैत यांनी समाचार घेतला. सरकारकडून कोणत्या नेत्यावर लावलेल्या आरोपांवर कमतरता राहिलीय का? आज शेतकरी निम्म्या किंमतीत त्यांचे उत्पादन विकतात, हेच चुकीचे आहे का, असे ते म्हणाले. 

शुक्रवारी राज्यसभेमध्ये कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काँग्रेस रक्ताची शेती करत असल्याचा आरोप केला होता. यावर टिकैत यांनी विरोधकांचे तर तेच सांगू शकतात, मी राज्यसभेतील चर्चा पाहिली नाही. शेतकरी शनिवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत दिल्लीसोडून देशभरात चक्का जाम आंदोलन करणार आहेत. 

'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

तोमर काय म्हणाले...

नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत कांग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही, असे सांगत नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरcongressकाँग्रेस