शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:36 IST

Farmer Protest: कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत.

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत. येत्या 6 जानेवारीला म्हणजे उद्या देशभर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहेत. (Farmer Protest continue for 70 days, on Saterday farmers called chakka jam in country.)

या पार्श्वभूमीवर आज आंदोलनस्थळी एक वेगळेच दृष्य दिसले. आंदोलनाच्या ठिकाणी एका वयोवृद्ध शेतकऱ्याला राकेश टिकैत यांनी त्यांच्या खांद्यावर मारले होते. टिकैत यांनी सांगितले की, वृद्ध शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातूनच आम्हाला समर्थन द्यावे. या आजोबांना आम्ही त्यांच्या गावी सोडलेले, मात्र ते पुन्हा आंदोलनात भाग घेण्यासाठी आले आहेत. उद्याचा चक्का जाम हा केवळ गावांमध्ये होणार आहे. दिल्लीमध्ये य़ाचा काहीच फरक दिसणार नाही. आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुर आहे. याद्वारे पुढे सरकारशी चर्चा केली जाईल. इथे गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलक बसले आहेत. चर्चा देखील झडत आहेत. इथे बसणारे सर्वच चुकीचे आहेत का, असा सवालही टिकैत यांनी विचारला आहे. 

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलेल्या आरोपांवर टिकैत यांनी समाचार घेतला. सरकारकडून कोणत्या नेत्यावर लावलेल्या आरोपांवर कमतरता राहिलीय का? आज शेतकरी निम्म्या किंमतीत त्यांचे उत्पादन विकतात, हेच चुकीचे आहे का, असे ते म्हणाले. 

शुक्रवारी राज्यसभेमध्ये कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काँग्रेस रक्ताची शेती करत असल्याचा आरोप केला होता. यावर टिकैत यांनी विरोधकांचे तर तेच सांगू शकतात, मी राज्यसभेतील चर्चा पाहिली नाही. शेतकरी शनिवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत दिल्लीसोडून देशभरात चक्का जाम आंदोलन करणार आहेत. 

'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

तोमर काय म्हणाले...

नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत कांग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही, असे सांगत नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरcongressकाँग्रेस