शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

तेलकंपन्यांची भारतामध्ये वर्षभरात 8 लाख 94 हजार 40 कोटींची उलाढाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 15:14 IST

इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी या तीन तेलकंपन्यांनी 2016-17 या वर्षभरामध्ये 8,94,040 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कर वजा करुन या कंपन्यांनी एकत्रित 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.

ठळक मुद्दे गेल्या वर्षी कर वगळून या तिन्ही कंपन्यांचा नफा 21,694 कोटी तर 2014-15 या वर्षात या कंपन्यांनी कर वगळून 13,091 कोटी रुपयांचा नफा मिळवल्याचे दिसून येते.

मुंबई- इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी या तीन तेलकंपन्यांनी 2016-17 या वर्षभरामध्ये 8,94,040 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कर वजा करुन या कंपन्यांनी एकत्रित 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. पुणेस्थित माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी मागवलेल्या माहितीमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.या तिन्ही कंपन्यांमध्ये 2016-17 या वर्षभरात इंडियन ऑइल कंपनीची उलाढाल सर्वात जास्त आहे. या कंपनीने 4 लाख 38 हजार 692 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. त्यापाठोपाठ भारत पेट्रोलियम कंपनीने 2,41,859 कोटींचा व्यवसाय केला असून भारत पेट्रोलियमने 2,13,489 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या तिन्ही कंपन्यांची 2015-16 या वर्षी 7लाख 11 हजार सातशे कोटींची उलाढाल होती. त्याआधीच्या वर्षी 8 लाख 80 हजार 675 कोटी रुपयांची उलाढाल या तिन्ही कंपन्यांनी केली होती. 2019-17 या वर्षभरात इंडियन ऑइल कंपनीने कर वजा करुन 19,106 कोटी रुपये नफा मिळवला आहे तर हिंदुस्थान पेट्रोलियमने 6,209 कोटी आणि भारत पेट्रोलियमने 8,039 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.  म्हणजेच कर वगळून या तिन्ही कंपन्यांनी या वर्षभरात 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्या वर्षी कर वगळून या तिन्ही कंपन्यांचा नफा 21,694 कोटी तर 2014-15 या वर्षात या कंपन्यांनी कर वगळून 13,091 कोटी रुपयांचा नफा मिळवल्याचे दिसून येते. याचाच अर्थ या कंपन्यांचा नफ्याचा आलेख वेगाने वाढत आहे. 19 ऑक्टोबर 2014 पासून पेट्रोलियम उत्पादनाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या पदार्थांच्या किंमतीवर ठरवल्या जात आहे. या किंमती ठरवण्याचे निर्णय ऑइल मार्केटिंग कंपन्यांद्वारे घेतले जातात.कर वजा जाता या तिन्ही कंपन्यांनी या 2014 ते 2017 या तीन वर्षांमध्ये 65 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवलेला आहे. या कंपन्यांनी आपल्या नफ्याचा वापर सामान्य ग्राहकांना देण्यासाठी करावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधनांचे दर कमी करण्यासाठी या कंपन्यांवर दबाव आणला पाहिजे असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :IndiaभारतPetrol Pumpपेट्रोल पंप