शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

तेलकंपन्यांची भारतामध्ये वर्षभरात 8 लाख 94 हजार 40 कोटींची उलाढाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 15:14 IST

इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी या तीन तेलकंपन्यांनी 2016-17 या वर्षभरामध्ये 8,94,040 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कर वजा करुन या कंपन्यांनी एकत्रित 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.

ठळक मुद्दे गेल्या वर्षी कर वगळून या तिन्ही कंपन्यांचा नफा 21,694 कोटी तर 2014-15 या वर्षात या कंपन्यांनी कर वगळून 13,091 कोटी रुपयांचा नफा मिळवल्याचे दिसून येते.

मुंबई- इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी या तीन तेलकंपन्यांनी 2016-17 या वर्षभरामध्ये 8,94,040 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कर वजा करुन या कंपन्यांनी एकत्रित 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. पुणेस्थित माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी मागवलेल्या माहितीमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.या तिन्ही कंपन्यांमध्ये 2016-17 या वर्षभरात इंडियन ऑइल कंपनीची उलाढाल सर्वात जास्त आहे. या कंपनीने 4 लाख 38 हजार 692 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. त्यापाठोपाठ भारत पेट्रोलियम कंपनीने 2,41,859 कोटींचा व्यवसाय केला असून भारत पेट्रोलियमने 2,13,489 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या तिन्ही कंपन्यांची 2015-16 या वर्षी 7लाख 11 हजार सातशे कोटींची उलाढाल होती. त्याआधीच्या वर्षी 8 लाख 80 हजार 675 कोटी रुपयांची उलाढाल या तिन्ही कंपन्यांनी केली होती. 2019-17 या वर्षभरात इंडियन ऑइल कंपनीने कर वजा करुन 19,106 कोटी रुपये नफा मिळवला आहे तर हिंदुस्थान पेट्रोलियमने 6,209 कोटी आणि भारत पेट्रोलियमने 8,039 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.  म्हणजेच कर वगळून या तिन्ही कंपन्यांनी या वर्षभरात 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्या वर्षी कर वगळून या तिन्ही कंपन्यांचा नफा 21,694 कोटी तर 2014-15 या वर्षात या कंपन्यांनी कर वगळून 13,091 कोटी रुपयांचा नफा मिळवल्याचे दिसून येते. याचाच अर्थ या कंपन्यांचा नफ्याचा आलेख वेगाने वाढत आहे. 19 ऑक्टोबर 2014 पासून पेट्रोलियम उत्पादनाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या पदार्थांच्या किंमतीवर ठरवल्या जात आहे. या किंमती ठरवण्याचे निर्णय ऑइल मार्केटिंग कंपन्यांद्वारे घेतले जातात.कर वजा जाता या तिन्ही कंपन्यांनी या 2014 ते 2017 या तीन वर्षांमध्ये 65 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवलेला आहे. या कंपन्यांनी आपल्या नफ्याचा वापर सामान्य ग्राहकांना देण्यासाठी करावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधनांचे दर कमी करण्यासाठी या कंपन्यांवर दबाव आणला पाहिजे असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :IndiaभारतPetrol Pumpपेट्रोल पंप