शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 10:28 IST

'ओडिशा असो की, मणिपूर... देशाच्या लेकी जळत आहेत. उद्ध्वस्त होत आहेत. मरत आहेत आणि तुम्ही गप्प बसला आहात? मोदीजी देशाला तुमचं मौन नकोय, उत्तर हवंय', असे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटले आहे.

Rahul Gandhi on odisha Student Case: ओडिशामध्ये एका २० वर्षीय विद्यार्थिनीने महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून लैंगिक छळ सुरू असलेल्या लैंगिक छळाला कंटाळून स्वतःला पेटवून घेतले. मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोदोजी तुम्ही गप्प का आहात? असा सवाल केला आहे. प्रत्येकवेळी भाजपची व्यवस्था आरोपींना वाचवण्याचेच काम करते आहे, असा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ओडिशातील बालासोरमध्ये असलेल्या फकीर मोहन ऑटोनॉमस महाविद्यालयातील २० वर्षीय विद्यार्थिनीने पेटवून घेतले. तिचा मंगळवारी भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राध्यापकाकडून लैंगिक छळ केला जात होता. त्याची तक्रार तिने महाविद्यालय प्रशासनाकडे केली, पण प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. तिने महाविद्यालयाच्या परिसरातच पेटून घेतले होते. 

ही भाजपच्या व्यवस्थेने केलेली हत्या -राहुल गांधी

विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, 'ओडिशामध्ये न्यायासाठी झगडणाऱ्या एका मुलीचा मृत्यू. ही सरळ-सरळ भाजपच्या व्यवस्थेने केलेली हत्या आहे.'

'त्या धाडसी विद्यार्थिनीने लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवला, पण न्याय देण्याऐवजी तिला धमकावलं गेलं. छळलं गेलं. तिला वारंवार अपमानित केलं गेलं. ज्यांच्यावर तिच्या रक्षकाची जबाबदारी होती, तेच तिच्यावर घाव घालत राहिले', असा संताप राहुल गांधींनी व्यक्त केला.  

भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले -राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, 'नेहमीप्रमाणे भाजपची व्यवस्था आरोपींना वाचत राहिली आणि एका निष्पाप लेकीला स्वतःला पेटवून घेण्यास भाग पाडले. ही आत्महत्या नाहीये, ही व्यवस्थेने केलेली सामूहिक हत्या आहे.'

'मोदीजी, ओडिशा असो की, मणिपूर... देशाच्या लेकी जळत आहेत. उद्ध्वस्त होत आहेत. मरत आहेत आणि तुम्ही गप्प बसला आहात? देशाला तुमचं मौन नकोय, उत्तर हवंय. भारताच्या लेकींना सुरक्षा आणि न्याय हवा आहे", अशी टीका राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ