शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019 : ओडिशात 'बीजेडी' ची विजयाच्या दिशेने वाटचाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 16:25 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ओडिशात बीजू जनता दलाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 21 पैकी 14 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ओडिशात बीजू जनता दलाने आघाडी घेतली आहे.21 पैकी 14 जागांवर बीजेडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपा 7 जागांवर पुढे आहे. 146 पैकी 114 जागांचे कल हाती आले असून 89 जागांवर आघाडी घेत बीजू जनता दल मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

भुवनेश्वर - 2014 मध्ये देशात भले मोदी लाट उसळली होती, परंतु ओडिशातील 21 पैकी 20 जागांवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलानं आपला झेंडा फडकवला होता. त्यांची ही ताकद लक्षात घेऊन, यावेळी त्यांना 'काँटे की टक्कर' देण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं कट्टर तयारी केली होती. मोदींसाठी तर ही लढाई प्रतिष्ठेची आहे. त्यात त्यांना यश येतं, की यावेळीही ओडिशाची जनता बीजू जनता दलालाच साथ देते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ओडिशात बीजू जनता दलाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 21 पैकी 14 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपा 7 जागांवर पुढे आहे. ओडिशामध्ये आज विधानसभा निवडणुकांचीही मतमोजणी होत आहे. येथील 146 पैकी 114 जागांचे कल हाती आले असून 89 जागांवर आघाडी घेत बीजू जनता दल मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांच्या तुलनेत ओडिशातून कमी खासदार लोकसभेत जात असले, तरी यावेळी तेच निर्णायक ठरू शकतात, असं जाणकारांनी सूचित केलंय. बीजू जनता दलाने गेल्या निवडणुकीप्रमाणेच मुसंडी मारली आणि इकडे त्रिशंकू निकाल लागला, तर देशाचा नायक ठरवण्यात नवीन पटनायक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अर्थात, आपण कुणासोबत आहोत किंवा कुणासोबत जाऊ, हे त्यांनी अजूनही गुलदस्त्यातच ठेवलं आहे.

'फनी' वादळानंतर मोदी सरकारला 'नवीन' बळ; सत्तेचं गणित होणार सोपं? 

फनी चक्रीवादळानं ओडिशामध्ये हाहाकार उडवला. या चक्रीवादळात ४१ जणांचा मृत्यू झाला असून मोठी वित्तहानीही झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिस्थितीची हवाई पाहणी करून १ हजार कोटींची तातडीची मदतही जाहीर केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. फनी चक्रीवादळाआधी नागरिकांच्या स्थलांतराचे आणि नंतर मदत आणि पुनर्वसनाचे काम ओडिशा सरकारने उत्तम प्रकारे केल्याचं प्रशस्तीपत्रक नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक यांना दिलं होतं. त्यांच्या या पत्राला पटनायक यांनी उत्तर पाठवलंय आणि त्यात केंद्राचे आभार मानलेत. गरजेच्या वेळी राज्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात एकमेकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या या दोन नेत्यांमधील हे कौतुकाचे बोल भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात, असं जाणकारांना वाटतंय. 

 

टॅग्स :Odisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी