शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ओदिशामधील रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी रद्द केली तिकिटं, काँग्रेसच्या आरोपांना रेल्वेचं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 21:39 IST

Odisha Coromandel Express Accident: ओदिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातावरून आता राजकारण पेटले आहे.

ओदिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातावरून आता राजकारण पेटले आहे. या रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी आपली रेल्वे प्रवासाची तिकिटं रद्द केल्याचा दावा काँग्रेसने केला होता. हा दावा आता आयआरसीटीसीने फेटाळून लावला आहे. काँग्रेसचे एख नेते भक्तचरण दास यांनी ओदिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनना झालेल्या अपघातानंतर तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या वाढल्याचा दावा केला होता. आयआरसीटीसीने काँग्रेस नेत्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच हा दावा चुकीचा असून, तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या वाढलेली नाही, असे सांगितले आहे.

काँग्रेस नेते भक्तचरण दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बालासोरमधील अपघातानंतक हजारो लोकांनी आपली ट्रेनची तिकीट रद्द केली आहेत. गेल्या काही काळात एवढा मोठा अपघात कधी झालेला नाही. मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकार अधिकृतपणे २७५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत आहे. मात्र अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत. हजारो लोक जखमी झालेले आहेत. हजारो लोकांनी आपली तिकिटं रद्द केली आहेत. या अपघातानंतर रेल्वे प्रवास सुरक्षित राहिलेला नाही.

त्यांचं हे वक्तव्य काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला होता. त्यालाच रीट्विट करत आयआरसीटीसीनं उत्तर दिलं आहे. शुक्रवार, २ जून रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतरचा तिकीट बुकिंग आणि रद्दीकरण डेटा सादर केला आहे. यात म्हटलं आहे की, वरील आरोप हा चुकीचा आहे. रद्दीकरण वाढलेलं नाही. तर रद्दीकरण घटकेलं आहे. १ जून रोजी ७.७ लाख तिकिटं रद्द झाली होती. तर ३ जून रोजी ७.५ लाख तिकिटं रद्द झाली.  

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वेcongressकाँग्रेस