शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

ओदिशामधील रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी रद्द केली तिकिटं, काँग्रेसच्या आरोपांना रेल्वेचं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 21:39 IST

Odisha Coromandel Express Accident: ओदिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातावरून आता राजकारण पेटले आहे.

ओदिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातावरून आता राजकारण पेटले आहे. या रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी आपली रेल्वे प्रवासाची तिकिटं रद्द केल्याचा दावा काँग्रेसने केला होता. हा दावा आता आयआरसीटीसीने फेटाळून लावला आहे. काँग्रेसचे एख नेते भक्तचरण दास यांनी ओदिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनना झालेल्या अपघातानंतर तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या वाढल्याचा दावा केला होता. आयआरसीटीसीने काँग्रेस नेत्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच हा दावा चुकीचा असून, तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या वाढलेली नाही, असे सांगितले आहे.

काँग्रेस नेते भक्तचरण दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बालासोरमधील अपघातानंतक हजारो लोकांनी आपली ट्रेनची तिकीट रद्द केली आहेत. गेल्या काही काळात एवढा मोठा अपघात कधी झालेला नाही. मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकार अधिकृतपणे २७५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत आहे. मात्र अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत. हजारो लोक जखमी झालेले आहेत. हजारो लोकांनी आपली तिकिटं रद्द केली आहेत. या अपघातानंतर रेल्वे प्रवास सुरक्षित राहिलेला नाही.

त्यांचं हे वक्तव्य काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला होता. त्यालाच रीट्विट करत आयआरसीटीसीनं उत्तर दिलं आहे. शुक्रवार, २ जून रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतरचा तिकीट बुकिंग आणि रद्दीकरण डेटा सादर केला आहे. यात म्हटलं आहे की, वरील आरोप हा चुकीचा आहे. रद्दीकरण वाढलेलं नाही. तर रद्दीकरण घटकेलं आहे. १ जून रोजी ७.७ लाख तिकिटं रद्द झाली होती. तर ३ जून रोजी ७.५ लाख तिकिटं रद्द झाली.  

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वेcongressकाँग्रेस