३१ ऑक्टोबरला नितीन गडकरी अकोल्यात उड्डाण पुलासह महामार्गाच्या चौपदरीकरणाचे फुटणार नारळ
By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:30+5:302015-10-03T00:20:30+5:30
अकोला:अमरावती ते जळगाव-धुळे ते गुजरात राज्य तसेच अकोला ते वाशिम ते आंध्र प्रदेशातील चंगारेड्डीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. तसेच शहरातील अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत उड्डाण पुलाचे निर्माण होईल. या विकास कामांचे नारळ फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ३१ ऑक्टोबर रोजी अकोल्यात दाखल होत आहेत.

३१ ऑक्टोबरला नितीन गडकरी अकोल्यात उड्डाण पुलासह महामार्गाच्या चौपदरीकरणाचे फुटणार नारळ
अ ोला:अमरावती ते जळगाव-धुळे ते गुजरात राज्य तसेच अकोला ते वाशिम ते आंध्र प्रदेशातील चंगारेड्डीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. तसेच शहरातील अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत उड्डाण पुलाचे निर्माण होईल. या विकास कामांचे नारळ फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ३१ ऑक्टोबर रोजी अकोल्यात दाखल होत आहेत.२०११ मध्ये अमरावती ते जळगाव-धुळे ते गुजरात राज्याच्या हद्दीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) निविदा प्रक्रिया राबवली असून, या कामाला प्रारंभ होणार आहे. यासोबतच अकोला ते वाशिम ते आंध्र प्रदेशमधील चंगारेड्डीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला देखील सुरुवात केली जाईल. यादरम्यान, अकोला ते आकोटमार्गे मध्य प्रदेशस्थित बैतुलपर्यंतच्या राज्यमार्गाला महामार्गाचा दर्जा देऊन रस्ता रुंदीकरणाची मागणी भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून होत आहे. शहरातील अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौकपर्यंत उड्डाण पूल प्रस्तावित करण्यात आला असून, यासर्व विकास कामांचे नारळ फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ३१ ऑक्टोबर रोजी शहरात दाखल होतील. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे दळणवळणाची मोठी समस्या निकाली निघणार असल्याचा विश्वास खासदार संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर यांनी व्यक्त केल्याचे प्रसिद्धिप्रमुख गिरीश जोशी यांनी पत्राद्वारे कळवले आहे.