शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

शांततेचा दावा करणारे दहशतवाद्यांना आश्रय देत नाहीत, भारताने UN मध्ये पाकिस्तानला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 11:53 IST

संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आरोप केले, या आरोपांना प्रत्युत्तर देताना भारताने पाकिसातनवर टीका केली.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आरोप केले, या आरोपांना प्रत्युत्तर देताना संयुक्त राष्ट्रमध्ये भारत प्रथम मिशनचे मिजिटो विनिटो यांनी युएनजीए मध्ये भारताच्या उत्तराच्या अधिकाराचा वापर करत पाकिस्तानवर टीका केली.  

... तर अख्ख्या जगाचा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करू; रशियाची भारतातून उघड धमकी

'या बैठकीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर खोटे आरोप केले हे खेदजनक आहे. आपल्या देशातील गैरकृत्ये लपवण्यासाठी आणि भारताविरुद्धच्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी त्यांनी हे केले आहे, असं मिजिटो विनिटो म्हणाले. 

''एक देश जर शांततेचा दावा करत असेल तर, तो देश कधीही कधीही दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही आणि मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांनाही आश्रय देणार नाही. एकाबाजूला शांततेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे दहशतवाद पसरवणे हे तुमचे काम आहे, अशी टीका मिजिटो विनिटो यांनी केली.

'' भारतावर खोटे आरोप करण्यापूर्वी आपल्या देशातील पाहिले. जम्मू-काश्मिरवर दावा करण्यापेक्षा दहशतवाद थांबवावा, असंही विनिटो म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर सुरू असलेल्या अत्याचाराची आठवण करुन दिली. 

काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शांततेवर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, पाकिस्तानला भारतासह आपल्या शेजारी देशांसोबत शांतता हवी आहे. पण काश्मिर प्रश्नावर हे सर्व अवलंबून आहे, असंही ते म्हणाले होते. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ