शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

नुपूर शर्मा प्रकरण: इस्लामिक देशांची संघटना OICला भारताने सुनावले खडेबोल, त्या आरोपांना दिलं चोख प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 17:36 IST

Nupur Sharma case: नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या टिप्पणीनंतर इस्लामिक देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीने भारतावर टीका केली होती. त्याला आता भारत सरकारकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या टिप्पणीनंतर इस्लामिक देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीने भारतावर टीका केली होती. त्याला आता भारत सरकारकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून, ओआयसीला खडेबोल सुनावण्यात आले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारत ओआयसीच्या सचिवालयाकडून करण्यात आलेल्या अनावश्यक आणि कोत्या मानसिकतेतून केलेल्या टिप्पणीला फेटाळून लावत आहे. तसेच भारत सर्व धर्मांप्रति सर्वोच्च सन्मान ठेवतो, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बागची यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी एका पूजनीय व्यक्तिमत्वाबाबत आक्रमक टिप्पणी आणि ट्विट केली होती. ही टिप्पणी कुठल्याही रूपात भारत सरकारच्या विचारांचे प्रदर्शन करत नाही. त्यांनी सांगितले की, संबंधित संघटनेने या व्यक्तींवर कठोर कारवाई केली आहे.

भाजपाने वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना रविवारी पक्षातून निलंबित केले. तर दिल्ली विभागाचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनाही पक्षातून हाकलण्याचा निर्णय घेतला. दोन्ही नेत्यांच्या वादग्रस्त टिप्पणींबाबत आखाती देशांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला होता.

या वक्तव्यांवर मुस्लिम समुदायाकडून होत असलेल्या विरोधानंतर भाजपाने या दोन्ही नेत्यांच्या विधानापासून स्वत:ला वेगळे केले. तसेच पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो, असे सांगितले. दरम्यान, अरिंदम बागची यांनी सांगितले की, ओआयसी सचिवालयाने पुन्हा एकदा विशिष्ट्य हेतून प्रेरित, दिशाभूल करणारी आणि खोडसाळ टिप्पणी केली आहे. ही टिप्पणी निश्चितपणे स्वार्थी तत्त्वांच्या शहावर त्यांच्या फुटिरतावादी अजेंड्याला उघड करते.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी ओआयसीच्या टिप्पणीवर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना पुढे सांगितले की, आम्ही ओआयसीच्या सचिवालयाला विनंती करतो की, त्यांनी सांप्रदायिक मार्गावर पुढे जाणे बंद करावे. तसेच सर्व धर्म आणि आस्थांबाबत सन्मान ठेवा. ओआयएने मोहम्मद पैगंबरांबाबत झालेल्या टिप्पणीवरून भारतावर टीका केली होती. तसेच भारतामध्ये मुस्लिमांच्या संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली होती.  

टॅग्स :IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारInternationalआंतरराष्ट्रीय