शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

नुपूर शर्मा प्रकरण: इस्लामिक देशांची संघटना OICला भारताने सुनावले खडेबोल, त्या आरोपांना दिलं चोख प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 17:36 IST

Nupur Sharma case: नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या टिप्पणीनंतर इस्लामिक देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीने भारतावर टीका केली होती. त्याला आता भारत सरकारकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या टिप्पणीनंतर इस्लामिक देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीने भारतावर टीका केली होती. त्याला आता भारत सरकारकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून, ओआयसीला खडेबोल सुनावण्यात आले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारत ओआयसीच्या सचिवालयाकडून करण्यात आलेल्या अनावश्यक आणि कोत्या मानसिकतेतून केलेल्या टिप्पणीला फेटाळून लावत आहे. तसेच भारत सर्व धर्मांप्रति सर्वोच्च सन्मान ठेवतो, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बागची यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी एका पूजनीय व्यक्तिमत्वाबाबत आक्रमक टिप्पणी आणि ट्विट केली होती. ही टिप्पणी कुठल्याही रूपात भारत सरकारच्या विचारांचे प्रदर्शन करत नाही. त्यांनी सांगितले की, संबंधित संघटनेने या व्यक्तींवर कठोर कारवाई केली आहे.

भाजपाने वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना रविवारी पक्षातून निलंबित केले. तर दिल्ली विभागाचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनाही पक्षातून हाकलण्याचा निर्णय घेतला. दोन्ही नेत्यांच्या वादग्रस्त टिप्पणींबाबत आखाती देशांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला होता.

या वक्तव्यांवर मुस्लिम समुदायाकडून होत असलेल्या विरोधानंतर भाजपाने या दोन्ही नेत्यांच्या विधानापासून स्वत:ला वेगळे केले. तसेच पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो, असे सांगितले. दरम्यान, अरिंदम बागची यांनी सांगितले की, ओआयसी सचिवालयाने पुन्हा एकदा विशिष्ट्य हेतून प्रेरित, दिशाभूल करणारी आणि खोडसाळ टिप्पणी केली आहे. ही टिप्पणी निश्चितपणे स्वार्थी तत्त्वांच्या शहावर त्यांच्या फुटिरतावादी अजेंड्याला उघड करते.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी ओआयसीच्या टिप्पणीवर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना पुढे सांगितले की, आम्ही ओआयसीच्या सचिवालयाला विनंती करतो की, त्यांनी सांप्रदायिक मार्गावर पुढे जाणे बंद करावे. तसेच सर्व धर्म आणि आस्थांबाबत सन्मान ठेवा. ओआयएने मोहम्मद पैगंबरांबाबत झालेल्या टिप्पणीवरून भारतावर टीका केली होती. तसेच भारतामध्ये मुस्लिमांच्या संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली होती.  

टॅग्स :IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारInternationalआंतरराष्ट्रीय