शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत रुग्णसंख्या घटली, सुमारे १० हजार खाटा रिक्त; मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 06:53 IST

एप्रिलमध्ये मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत गेला होता. तेव्हा दैनंदिन रूग्णसंख्या ९-१० हजारांच्या आसपास नोंदवली जात होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या.

मुंबई : कोरोनाचा प्रसार आता मुंबईत हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रुग्णसंख्येतही मोठी घट होत आहे. त्यामुळे मुंबईतील १७८ रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी राखीव ९,२७९ खाटा रिकाम्या आहेत तर अतिदक्षता विभागातही आता १६४ खाटा रिक्त आहेत, अशी माहिती मुंबईचे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शनिवारी दिली. (The number of patients in Mumbai has decreased, 10,000 beds are vacant; Information of Mumbai Municipal Commissioner)

एप्रिलमध्ये मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत गेला होता. तेव्हा दैनंदिन रूग्णसंख्या ९-१० हजारांच्या आसपास नोंदवली जात होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. बाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने टप्प्याटप्प्याने खाटांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली. त्यानुसार कोविड रुग्णांसाठी १७८ रुग्णालयांमध्ये २२ हजार ७०३ खाटा राखीव ठेवण्यात आल्या. यापैकी ४० टक्के खाटा आता रिकाम्या आहेत.

आयसीयू, व्हेंटिलेटर खाटाही उपलब्ध...मार्च - एप्रिल महिन्यात रुग्णांचा आकडा वाढल्याने मुंबईत ऑक्सिजन खाटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आयसीयू, व्हेंटिलेटर खाटाही कमी पडू लागल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याने अतिदक्षता विभागातील रिक्त खाटांचे प्रमाणही १६४ आहे तर ३२ व्हेंटिलेटर खाटा रिक्त आहेत.

मुंबई पालिका आयुक्तांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्णमे २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे राज्य सरकारने इक्बालसिंह चहल यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन कोरोना विरोधातील लढा यशस्वी करण्यात आला. चेस दि व्हायरस, वॉर्ड वॉर रूममार्फत खाटांचे नियोजन आणि आता मुंबई मॉडल आदर्श ठरले. धारावी पॅटर्नचे जागतिक स्तरावर कौतुक झाले. तर गेल्या महिन्यात संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना, विविध उपाययोजना राबवून रुग्णांना वाचविण्याचे काम महापालिकेने केले. बाधित रुग्णांना शोधणे, विभाग स्तरावरील वॉर रूममार्फत रुग्णांना खाटा उपलब्ध करणे, जंबो फिल्ड रुग्णालयांची निर्मिती, खाटांची संख्या वाढवणे, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवणे, खासगी रुग्णालयाने दिलेले सहकार्य. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा प्रभाव, पालिका कर्मचारी-अधिकारी यांनी दिवस-रात्र केलेली मेहनत यामुळे पॉझिटिव्हिटीचा दर कमी आणण्यात यश आले, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकार