शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

नूंह हिंसाचार : ४४  FIR दाखल, ७० जण ताब्यात…; दंगेखोरांना सोडले जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 19:53 IST

या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले असून ७० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

नूंह : हरयाणामधील नूंह जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) धार्मिक यात्रेदरम्यान झालेला हिंसाचार आणि तणावानंतर येथे मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. या हिंसाचारात जवळपास पाच जण ठार तर अनेक जण जखमी झाले. व्हीएचपीच्या रॅलीमध्ये प्रमुख गोरक्षक मोनू मानेसर यांच्या कथित उपस्थितीवरून तणाव शिगेला पोहोचल्यानंतर नूंह आणि गुरुग्राममध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले असून ७० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दल आणि पोलिस दलाच्या २०-२० कंपन्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही नूंहमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बैठक घेतली. या बैठकीनंतर मनोहर लाल खट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "नुंहमध्ये जे काही घडले ते दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासनाला तातडीने पाठविण्यात आले. दरवर्षी निघणाऱ्या सामाजिक यात्रेवर काही लोकांनी हल्ला केला. यावेळी पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले."

याचबरोबर, मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, "नियोजित आणि कट रचून यात्रा उधळली गेली, जे मोठे षड्यंत्र दर्शवते. वाहने जाळण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, सध्या नुंहसह सर्वत्र परिस्थिती सामान्य आहे. या घटनेत सहभागी असलेल्या नूंह बाहेरील लोकांची ओळख पटवली जात आहे. दंगेखोरांना सोडले जाणार नाही. सर्व नागरिकांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे यावे. कुठेही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवावे. हेल्पलाइन क्रमांक-११२ आणि ८९३०९००२८१ वर याबाबत माहिती देऊ शकतात."

पोलिसांनी काढला फ्लॅग मार्चनूंह येथील एसपी नरेंद्र सिंह बिजारणिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, "जिल्ह्यात विविध ठिकाणी निमलष्करी दलाच्या २० कंपन्या आणि पोलिस दलाच्या २० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, सकाळी पोलिस दलाकडून फ्लॅग मार्चही काढण्यात आला आहे. कलम-१४४ चे पालन सुनिश्चित केले जात आहे आणि कर्फ्यू नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच, काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणा