शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

नूंह हिंसाचार : ४४  FIR दाखल, ७० जण ताब्यात…; दंगेखोरांना सोडले जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 19:53 IST

या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले असून ७० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

नूंह : हरयाणामधील नूंह जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) धार्मिक यात्रेदरम्यान झालेला हिंसाचार आणि तणावानंतर येथे मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. या हिंसाचारात जवळपास पाच जण ठार तर अनेक जण जखमी झाले. व्हीएचपीच्या रॅलीमध्ये प्रमुख गोरक्षक मोनू मानेसर यांच्या कथित उपस्थितीवरून तणाव शिगेला पोहोचल्यानंतर नूंह आणि गुरुग्राममध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले असून ७० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दल आणि पोलिस दलाच्या २०-२० कंपन्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही नूंहमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बैठक घेतली. या बैठकीनंतर मनोहर लाल खट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "नुंहमध्ये जे काही घडले ते दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासनाला तातडीने पाठविण्यात आले. दरवर्षी निघणाऱ्या सामाजिक यात्रेवर काही लोकांनी हल्ला केला. यावेळी पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले."

याचबरोबर, मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, "नियोजित आणि कट रचून यात्रा उधळली गेली, जे मोठे षड्यंत्र दर्शवते. वाहने जाळण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, सध्या नुंहसह सर्वत्र परिस्थिती सामान्य आहे. या घटनेत सहभागी असलेल्या नूंह बाहेरील लोकांची ओळख पटवली जात आहे. दंगेखोरांना सोडले जाणार नाही. सर्व नागरिकांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे यावे. कुठेही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवावे. हेल्पलाइन क्रमांक-११२ आणि ८९३०९००२८१ वर याबाबत माहिती देऊ शकतात."

पोलिसांनी काढला फ्लॅग मार्चनूंह येथील एसपी नरेंद्र सिंह बिजारणिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, "जिल्ह्यात विविध ठिकाणी निमलष्करी दलाच्या २० कंपन्या आणि पोलिस दलाच्या २० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, सकाळी पोलिस दलाकडून फ्लॅग मार्चही काढण्यात आला आहे. कलम-१४४ चे पालन सुनिश्चित केले जात आहे आणि कर्फ्यू नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच, काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणा