शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

नूंह हिंसाचार : ४४  FIR दाखल, ७० जण ताब्यात…; दंगेखोरांना सोडले जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 19:53 IST

या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले असून ७० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

नूंह : हरयाणामधील नूंह जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) धार्मिक यात्रेदरम्यान झालेला हिंसाचार आणि तणावानंतर येथे मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. या हिंसाचारात जवळपास पाच जण ठार तर अनेक जण जखमी झाले. व्हीएचपीच्या रॅलीमध्ये प्रमुख गोरक्षक मोनू मानेसर यांच्या कथित उपस्थितीवरून तणाव शिगेला पोहोचल्यानंतर नूंह आणि गुरुग्राममध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले असून ७० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दल आणि पोलिस दलाच्या २०-२० कंपन्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही नूंहमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बैठक घेतली. या बैठकीनंतर मनोहर लाल खट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "नुंहमध्ये जे काही घडले ते दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासनाला तातडीने पाठविण्यात आले. दरवर्षी निघणाऱ्या सामाजिक यात्रेवर काही लोकांनी हल्ला केला. यावेळी पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले."

याचबरोबर, मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, "नियोजित आणि कट रचून यात्रा उधळली गेली, जे मोठे षड्यंत्र दर्शवते. वाहने जाळण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, सध्या नुंहसह सर्वत्र परिस्थिती सामान्य आहे. या घटनेत सहभागी असलेल्या नूंह बाहेरील लोकांची ओळख पटवली जात आहे. दंगेखोरांना सोडले जाणार नाही. सर्व नागरिकांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे यावे. कुठेही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवावे. हेल्पलाइन क्रमांक-११२ आणि ८९३०९००२८१ वर याबाबत माहिती देऊ शकतात."

पोलिसांनी काढला फ्लॅग मार्चनूंह येथील एसपी नरेंद्र सिंह बिजारणिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, "जिल्ह्यात विविध ठिकाणी निमलष्करी दलाच्या २० कंपन्या आणि पोलिस दलाच्या २० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, सकाळी पोलिस दलाकडून फ्लॅग मार्चही काढण्यात आला आहे. कलम-१४४ चे पालन सुनिश्चित केले जात आहे आणि कर्फ्यू नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच, काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणा