शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

'370 रद्द' होताच अजित डोवाल काश्मीरमध्ये; जनतेशी बोलले, एकत्रच जेवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 18:50 IST

पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अजित डोवाल यांनी सुरक्षा दलाच्या जवानांसोबतही सुरक्षेतेबाबत चर्चा केली

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कमल 370 रद्द केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल येथील शोपियनमध्ये पोहोचले आहेत. याठिकाणी अजित डोवाल यांनी लोकांशी संवाद साधला. याशिवाय येथील लोकांसोबत जेवणही केले.  

सोमवारी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कमल 370 रद्द करण्यात आले. यानंतर सुरक्षेतेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू-काश्मीरला दाखल झाले आहेत. राज्यातील विविध ठिकाणच्या परिस्थितीची त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यानंतर अजित डोवाल यांनी शोपियनमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला. तसेच, त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला. 

याचबरोबर, पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अजित डोवाल यांनी सुरक्षा दलाच्या जवानांसोबतही सुरक्षेतेबाबत चर्चा केली. कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच अजित डोवाल जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. अजित डोवाल यांच्याआधी मंगळवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेतेचा आढावा घेतला. तसेच, संबंधित जिल्ह्यातील पोलीस आयुक्तांना आपल्या भागातील लोकांची मदत करण्याचे निर्देश दिले होते. 

दरम्यान, याआधी गेल्या महिन्यात अजित डोवाल जम्मू-काश्मीरला गेले होते. त्यानंतर अजित डोवाल दिल्लीला परतल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात करण्यात आले. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही दिवसानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटविण्यात आले. 

गेल्या सोमवारी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जवळपास एक तास सुरक्षेतेच्या मुद्द्यावरील  सीसीएसची बैठक झाली होती. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अजित डोवाल सुद्धा उपस्थित होते.   

(अजित डोवालांच्या दौऱ्यानंतर काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त जवान, मेहबूबा मुफ्तींचा विरोध)

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370