शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 18:56 IST

केंद्र सरकारच्या या निर्णयावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे'हा नवा भारत आहे, याठिकाणी गुन्हेगारीला पुरस्कार दिला जातो'महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड रामनवमी 2 एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी मंदिर उभारणीचे काम सुरू करावे, असाच ट्रस्टचा प्रयत्न आहे.

हैदराबाद : केंद्र सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील आरोपी नृत्य गोपाल दास यांना अध्यक्ष आणि व्हीएचपीचे उपाध्यक्ष चंपत राय यांची महासचिव म्हणून निवड केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.  हा नवा भारत असून या ठिकाणी गुन्हेगारीचे काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो, असे सांगत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी यांदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देताना मशीद विध्वंस करण्याचे कृत्य लाजिरवाणे असल्याचे म्हटले होते. हा त्याचाच सिक्वल आहे. एक व्यक्ती जो बाबरी मशीद पाडण्याचा आरोपी आहे, त्याच्याकडे सरकारने राम मंदिर उभारणीची जबाबदारी सोपविली आहे. हा नवा भारत आहे, याठिकाणी गुन्हेगारीला पुरस्कार दिला जातो." 

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या काल झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर चंपत राय यांना या ट्रस्टचे सरचिटणीस बनविण्यात आले. महंत नृत्य गोपाल दास 1984 पासून राम मंदिर आंदोलनाशी निगडीत आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली मंदिर कार्यशाळेत राम मंदिरासाठी दगड शोधण्याचे काम सुरू होते. बाबरी विध्वंसानंतर सीबीआय कोर्टात दास आणि राय यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे.

दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कामाला आता सुरुवात झाली असून, पुढील 15 दिवसांत प्रत्यक्ष मंदिर बांधकाम कधी सुरू करायचे, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी लवकरच अयोध्येत जाणार असून, तेथील संत-महन्तांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष भूमिपूजनाची तारीख ठरविण्यात येईल. ट्रस्टच्या कालच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रामनवमी 2 एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी मंदिर उभारणीचे काम सुरू करावे, असाच ट्रस्टचा प्रयत्न आहे. पण तोपर्यंत सर्व औपचारिक बाबी पूर्ण झाल्या, तरच कामास प्रारंभ करता येणार आहे.

2024पर्यंत मंदिर पूर्ण?या मंदिराचे काम कधीही सुरू झाले तरी ते 2024 पर्यंत कोणत्याही स्थितीत पूर्ण व्हावे, असा ट्रस्ट प्रयत्न करेल. किंबहुना ते मंदिर तोपर्यंत बांधून पूर्ण करायचे, असेच ठरविण्यात आले आहे. लोकसभेच्या पुढील निवडणुका 2024मध्ये होतील. त्याआधी मंदिर झाले, तर त्याचा फायदा भाजपला मिळेल, असे त्या पक्षाच्या तसेच संघ परिवारातील मंडळींचे म्हणणे आहे. आम्ही आमची घोषणा पूर्ण केली, असे सरकारही तेव्हा सांगू शकेल. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या