शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

एनआरसी अंमलबजावणीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 05:33 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालसह देशभर एनसीआर लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

नवी दिल्ली : देशभर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे केंद्र सरकारतर्फे, मंगळवारी लोकसभेत सांगण्यात आले.

एनआरसीच्या विरोधात दिल्ली, मुंबई, कोलकातासह देशाच्या अनेक भागांत रोज आंदोलने सुरू असताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. याखेरीज राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) करताना लोकांकडून कोणतीही कागदपत्रे घेण्यात येणार नाहीत आणि आधार देणेही सक्तीचे नसेल, असेही राय यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालसह देशभर एनसीआर लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. तेव्हापासून एनआरसी, एनपीआर व सीएए यांच्याविरोधात देशात आंदोलने सुरू आहेत. दिल्लीच्या शाहीनबागमध्ये गेले ५२ दिवस हजारो महिला ठिय्या आंदोलन करीत आहेत. देशातील २0 विरोधी पक्षांनी केंद्राच्या या तिन्ही निर्णयांच्या विरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती.

केंद्र सरकारच्या या दोन घोषणा म्हणजे माघार असल्याचे मानले जाते. एनआरसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे का, कधीपर्यंतच्या लोकांना त्यात सामावून घेतले जाईल, त्याला काही राज्यांनी विरोध दर्शवला आहे का, केंद्र सरकारने राज्यांशी चर्चा केली आहे का, या चंदन सिंग व नागेरश्व राव यांच्या प्रश्नाच्या उत्तरात राय म्हणाले की, एनआरसी देशात लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही.

१ एप्रिलपासून नोंदणी

राय यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून होणाऱ्या लोकसंख्या नोंदणीबाबत राज्यांशी चर्चा सुरू आहे. या नोंदणीच्या वेळी नागरिकांना कोणतीही कागदपत्रे वा पुरावे सादर करावे लागणार नाहीत. आधारचा पुरावा देणेही ऐच्छिक असेल. तसेच नागरिकांनी दिलेल्या माहितीची शहानिशा केली जाणार नाही.

टॅग्स :National Register of CitizensएनआरसीBJPभाजपाIndiaभारत