शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आता ‘तृणमूल’च, ‘काँग्रेस’ नाहीच; ममतांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 01:30 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या चिन्हातून आता काँग्रेस हे नाव काढून टाकले असून, यापुढे पक्षाच्या लोगोमध्ये निवडणूक चिन्हे व त्याखाली तृणमूल एवढेच लिहिल्याचे दिसेल.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या चिन्हातून आता काँग्रेस हे नाव काढून टाकले असून, यापुढे पक्षाच्या लोगोमध्ये निवडणूक चिन्हे व त्याखाली तृणमूल एवढेच लिहिल्याचे दिसेल. लोकसभा निवडणुकांच्या आधी घाईघाईने ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला आहे.पश्चिम बंगालमध्ये जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेस, डावी आघाडी, भाजपा व काँग्रेस अशा चौरंगी लढती होणार आहेत. मध्यंतरी काँग्रेस व तृणमूल काँग्रेस यांच्यात जवळीक वाढताना दिसत होती. त्याचा फटका निवडणुकात बसू नये आणि तृणमूल व काँग्रेस यांचा छुपा समझोता आहे, असा आरोप भाजपाला करता येऊ नये, यासाठीच ममता बॅनर्जी यांनी लोगोमधून काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला असल्याचे सांगण्यात येते.मात्र त्यामुळे पक्षाचे नाव बदलले जाणार नाही. ते तृणमूल काँग्रेसच राहील, कारण ‘तृणमूल काँग्रेस’ याच नावाने पक्षाची नोंदणी झाली आहे. मात्र प्रचारात केवळ तृणमूल एवढाच उल्लेख करण्यात येईल, असे तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. (वृत्तसंस्था)२१ वर्षांनंतरसंबंध संपलाममता बॅनर्जी यांनी २१ वर्षांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. नव्या पक्षाच्या नावाच्या निमित्ताने त्यांचा आजतागायत काँग्रेसशी संबंध होता. पण आता पक्षाच्या नावातून काँग्रेसचा उल्लेखही काढून टाकण्यात आला आहे. त्यासाठी पक्षाने निवडणूक चिन्हासह नवा लोगो प्रसिद्ध केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक