शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आता नवभारताचे स्वप्न साकार करण्याचे लक्ष्य; मुख्यमंत्री केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांपुढे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 06:25 IST

पंजाबमध्ये आपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री केजरीवाल पंजाबहून दिल्लीत आले. दीनदयाल उपाध्याय मार्गावरील आपच्या कार्यालयात जमलेल्या आपच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्ली व पंजाबनंतर आता नवभारत घडविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपमध्ये सामील व्हावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीत कार्यकर्त्यांपुढे भाषण करताना केले.

पंजाबमध्ये आपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री केजरीवाल पंजाबहून दिल्लीत आले. दीनदयाल उपाध्याय मार्गावरील आपच्या कार्यालयात जमलेल्या आपच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. 

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगतसिंग यांचे स्वप्न आता पंजाबमध्ये साकार होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, सामान्य माणसांमध्ये मोठी ताकद असते. आपला हरविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन माझ्याविरोधात राळ उडविली. केजरीवाल आतंकवादी असल्याचाही आरोप काहींनी केला. विरोधकांच्या आरोपांना पंजाबच्या जनतेनी उत्तर दिले. केजरीवाल आतंकवादी नसून या देशातील सच्चा सपूत असल्याचे जनतेने सांगितले. 

आपच्या कार्यालयात विजयाचा जल्लोषपंजाबमध्ये विजयाचा कल दिसू लागल्याबरोबर आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात ढोल ताशांसह कार्यकर्ते जमा झाले व विजयाचा जल्लोष साजरा केला. पंजाबच्या विजयाचे वृत्त मिळाल्यानंतर बहुतेक नेते पंजाबकडे रवाना झाले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आधीच पंजाबमध्ये गेले होते. पंजाबमध्ये सत्ता मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियासुद्धा चंदीगडला रवाना झाले होते.

काँग्रेसच्या कार्यालयात शांतताअकबर रोडवर असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयात शांतता होती. निवडणूक पार पडलेल्या किमान तीन राज्यांमध्ये काँग्रेसला यश मिळेल, असा कयास लावला जात होता; परंतु एकाही राज्यामध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे काँग्रेसच्या कार्यालयात नेहमीचे वातावरण कायम होते. 

भाजप कार्यालय जल्लोषापासून दूरआपच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाजपच्या मुख्यालयात मात्र जल्लोष नव्हता. चार राज्यांमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपच्या कार्यालयात साधेपणाने हा विजय स्वीकारल्याचे दिसून येत होते. विविध चॅनलच्या पत्रकारांशिवाय भाजपचे वरिष्ठ नेतेही यावेळी हजर नव्हते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयी राज्यांमध्ये जल्लोष साजरा करावा, असे निर्देश दिल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२