शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता नवभारताचे स्वप्न साकार करण्याचे लक्ष्य; मुख्यमंत्री केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांपुढे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 06:25 IST

पंजाबमध्ये आपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री केजरीवाल पंजाबहून दिल्लीत आले. दीनदयाल उपाध्याय मार्गावरील आपच्या कार्यालयात जमलेल्या आपच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्ली व पंजाबनंतर आता नवभारत घडविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपमध्ये सामील व्हावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीत कार्यकर्त्यांपुढे भाषण करताना केले.

पंजाबमध्ये आपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री केजरीवाल पंजाबहून दिल्लीत आले. दीनदयाल उपाध्याय मार्गावरील आपच्या कार्यालयात जमलेल्या आपच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. 

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगतसिंग यांचे स्वप्न आता पंजाबमध्ये साकार होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, सामान्य माणसांमध्ये मोठी ताकद असते. आपला हरविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन माझ्याविरोधात राळ उडविली. केजरीवाल आतंकवादी असल्याचाही आरोप काहींनी केला. विरोधकांच्या आरोपांना पंजाबच्या जनतेनी उत्तर दिले. केजरीवाल आतंकवादी नसून या देशातील सच्चा सपूत असल्याचे जनतेने सांगितले. 

आपच्या कार्यालयात विजयाचा जल्लोषपंजाबमध्ये विजयाचा कल दिसू लागल्याबरोबर आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात ढोल ताशांसह कार्यकर्ते जमा झाले व विजयाचा जल्लोष साजरा केला. पंजाबच्या विजयाचे वृत्त मिळाल्यानंतर बहुतेक नेते पंजाबकडे रवाना झाले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आधीच पंजाबमध्ये गेले होते. पंजाबमध्ये सत्ता मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियासुद्धा चंदीगडला रवाना झाले होते.

काँग्रेसच्या कार्यालयात शांतताअकबर रोडवर असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयात शांतता होती. निवडणूक पार पडलेल्या किमान तीन राज्यांमध्ये काँग्रेसला यश मिळेल, असा कयास लावला जात होता; परंतु एकाही राज्यामध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे काँग्रेसच्या कार्यालयात नेहमीचे वातावरण कायम होते. 

भाजप कार्यालय जल्लोषापासून दूरआपच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाजपच्या मुख्यालयात मात्र जल्लोष नव्हता. चार राज्यांमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपच्या कार्यालयात साधेपणाने हा विजय स्वीकारल्याचे दिसून येत होते. विविध चॅनलच्या पत्रकारांशिवाय भाजपचे वरिष्ठ नेतेही यावेळी हजर नव्हते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयी राज्यांमध्ये जल्लोष साजरा करावा, असे निर्देश दिल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२