शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आता एकमेव पर्याय; देशात संपूर्ण लॉकडाऊन होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 22:18 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अशाप्रकारे मागणी केली होती. त्यानंतर आता देशात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. त्याचा आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम जाणवू लागला आहे.हॉस्पिटलमध्ये बेड्स, मेडिकल ऑक्सिजन, रेमडेसिवीरसारख्या औषधांचा तुटवडा भासत आहे. देशात सध्या अनेक राज्य अशी आहेत ज्याठिकाणी लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावले आहेत.

नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट देशासमोर नवं संकट घेऊन उभी राहिली आहे. कितीही तयारी केली तरी आपल्याला आधी ऑक्सिजन, औषधं आणि अन्य वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा सहन करावा लागत आहे. यातच आता मेडिकल स्टाफच्या अभावाचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी आता एकच पर्याय आहे तो म्हणजे देशव्यापी लॉकडाऊन

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अशाप्रकारे मागणी केली होती. त्यानंतर आता देशात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची मागणी जोर धरू लागली आहे. देशात कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. त्याचा आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम जाणवू लागला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड्स, मेडिकल ऑक्सिजन, रेमडेसिवीरसारख्या औषधांचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनची कमतरता आणि आवश्यक औषधं न मिळाल्याने अनेक रुग्ण रस्त्यावरच जीव तोडताना दिसत आहेत. दिवसाला ४ लाखाच्या आसपास कोरोनाबाधित आढळत आहेत. प्रत्येक दिवशी ४ हजारांपर्यंत मृत्यूंची नोंद होतेय. महाराष्ट्रात लॉकडाऊनसारख्या निर्बंधांमुळे कोरोनाची नवी रुग्णसंख्या स्थिरावली आहे. कर्नाटक आणि केरळसारख्या राज्यात दिवसाला ५० हजार कोरोनाबाधित आढळत आहेत.

सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टनेही लॉकडाऊनचा विचार सांगितला आहे.  

देशातील विविध राज्यातील हायकोर्टासह सुप्रीम कोर्टानेही केंद्र आणि राज्य सरकारला लॉकडाऊनवर विचार करायला सांगितलं आहे. देशात सध्या अनेक राज्य अशी आहेत ज्याठिकाणी लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावले आहेत. काही राज्यांनी हायकोर्टाच्या निर्देशानंतर राज्यात निर्बंधांची घोषणा केली आहे. इलाहाबाद हायकोर्टाने जेव्हा यूपी सरकारला कोरोनाने सर्वाधित प्रभावित जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले तेव्हा सरकारला जाग आली. सुरूवातीला विकेंड लॉकडाऊन लावणाऱ्या यूपी सरकारने त्यानंतर १० दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. पटणा हायकोर्टाने फटकारल्यानंतर बिहार सरकारने राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

लसीचे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरणही धीम्या गतीनं

आता देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यातच वैज्ञानिकांनी तिसऱ्या लाटेचा धोकाही सांगितला आहे. लसीकरण जानेवारीपासून सुरू झालंय. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येत आहे. परंतु पर्यायी साठा उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण धीम्या गतीने सुरू आहे. अनेक राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणही सुरू झालं नाही. ज्या राज्यात सुरू झालं तिथेही काही केंद्रावरच लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत देशात कडक लॉकडाऊन लावावा असं तज्ज्ञ सांगत आहेत.

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मागील आठवड्यातच कडक लॉकडाऊनची मागणी केली आहे. कोरोना संक्रमण वेगाने पसरत असल्याने ही साखळी तोडणं गरजेचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची शिफारस अनेकजण करत आहेत. लॉकडाऊनमुळे कोणत्याही ठिकाणी लोकांची गर्दी होणार नाही. यामुळे वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात ब्रेक लावू शकतो असं तज्ज्ञांना वाटतं. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनीही तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी केली असून सोशल डिस्टेसिंग, मास्क लावणे यासारखे नियम सक्तीने पाळावे लागतील असं म्हटलं आहे.

देशव्यापी लॉकडाऊनसाठी केंद्र सरकार का मान्य नाही?  

४ मे रोजी राहुल गांधी यांनी ट्विट करून कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन एकच मार्ग शिल्लक असल्याचं सांगितलं. त्याचसोबत लॉकडाऊनमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित रक्कम योजना देण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला. दुसरीकडे केंद्र सरकार देशात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यापासून मागे हटत आहे. कारण लोकांचे जीव वाचवावेत की इकोनॉमी या द्विधा मनस्थितीत सरकार आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. जी सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर सोडला आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावले आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार