शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:36 IST

चीन-पाकिस्तान सीमेवर लक्ष ठेवेल... हिंदी महासागरही येईल टप्प्यात...!

ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतर, आता भारताने आपली लष्करी ताकद आणखी वाढविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत, आता भारत पुढील चार वर्षांत अर्थात २०२९ पर्यंत ५२ विशेष संरक्षण उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. हे सर्व उपग्रह चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या सीमेवर लक्ष ठेवतील. हे सर्व उपग्रह आर्टिफिशियल इंटॅलिजन्स (AI) बेस्ड असतील.

गेल्या वर्षीही देण्यात आली होती कोट्यवधींची मंजुरी -ही संपूर्ण मोहीम संरक्षण अंतराळ संस्थेअंतर्गत चालवली जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा व्यवहारांसंदर्भातील मंत्रिमंडळ समितीने यासाठी २६,९६८ कोटी रुपये मंजूर केले होते. या योजनेंतर्गत, इस्रो २१ उपग्रह तयार करून प्रक्षेपित करणार आहे, तर तीन भारतीय खाजगी कंपन्या ३१ उपग्रह तयार करतील.

पहिला उपग्रह एप्रिल २०२६ मध्ये प्रक्षेपित केला जाईल -हे उपग्रह लो-अर्थ ऑर्बिट आणि जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये तैनात केले जातील. पहिला उपग्रह एप्रिल २०२६ मध्ये प्रक्षेपित केला जाईल. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा कालावधी आणखी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेस-बेस्ड सर्व्हिलान्सच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (SBS-3) हे सर्व सुरू आहे. 

चीन-पाकिस्तान सीमेवर लक्ष ठेवेल... हिंदी महासागरही येईल टप्प्यात - एसबीएस-3 चा मुख्य उद्देश चीन आणि पाकिस्तानच्या अधिकांश भागांवर लक्ष ठेवणे असा आहे. याने हिंदी महासागरावरही लक्ष ठेवले जाईल. हे सर्व उपग्रह अंतराळात भारताचे डोळे म्हणून कार्यरत राहतील. तसेच मेसेज आणि फोटो पाठवत राहतील. यामुळे भारताची सुरक्षितता आणखी बळकट होईल.

टॅग्स :Governmentसरकारisroइस्रोPakistanपाकिस्तानchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी