आता गटशेती ठरेल फायद्याची नाथराव कराड : हिरज येथील कृषी तंत्रज्ञान महोत्सव
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:28+5:302015-01-23T23:06:28+5:30
फोटो- 22 केव्हीके, 22 केव्हीके 1

आता गटशेती ठरेल फायद्याची नाथराव कराड : हिरज येथील कृषी तंत्रज्ञान महोत्सव
फ टो- 22 केव्हीके, 22 केव्हीके 1सोलापूर: कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न, उत्पादित मालाला चांगला भाव मिळण्यासाठी आता गट संघटनात्मक शेती हा उत्तम मार्ग असल्याचे कृषिभूषण नाथराव कराड यांनी शेतकर्यांना प्रबोधन करताना सांगितले.कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीने हिरज येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सव- 2015 मध्ये ते बोलत होते. ढिगभर शेती करुन मुठभर उत्पन्न काढण्याची पद्धत शेतकर्यांना घाट्याची ठरत असल्याने आता कमीत-कमी क्षेत्रात अधिक उत्पादन काढण्यासाठी गटशेती करणेच योग्य असल्याचे कराड यांनी सांगितले. शेतीमधून अर्थार्जनासाठी शेतकर्यांनी सुधारित शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी सांगितले. यावेळी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ एस.बी. माने-पाटील, कृषिभूषण परमेश्वर राऊत, कृषी पणन महामंडळाचे व्यवस्थापक डी.एल. तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी एस.आर. शिरपूरकर, बँक ऑफ इंडियाचे लीड बँक अधिकारी र्शीनिवास पत्की, डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ ज्योत्स्ना शर्मा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किरण पराग, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे संशोधन अधिकारी डॉ. व्ही.एम. अमृतसागर, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक देसाई, उपसंचालक विजय बरबडे, डॉ. लालासाहेब तांबडे, डॉ. पी.व्ही. कदम, विकास भिसे, अमोल शास्त्री, सुरेश कबाडे आदींनीही प्रगत शेतीबाबत मार्गदर्शन केले. 0 फोटो ओळी- हिरज येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सव- 2015 मध्ये शिवार फेरीत शेतकरी, कृषी खात्याचे अधिकारी आदी.